Sunday, 1 April 2018

उसंत हवं आहे जीवाला...!



शीर्षक - अ(महत्वाच्या) व्यापात व्यस्थ असलेली "आपली" माणसं
लेखक - एन.के. (पत्रकार)
मोबा.- ८८०६६०५८५२
आधुनिक जग आणि मानवी जीवनातील वेग याचा संगनमताने विचार केला तर दोन्हीला गती आहे. या गतिमान जीवनात आपण कितपत आपल्या माणसासोबत वेळ घालवतो ? आपल्या माणसासोबत व्यक्तिशः कित्ती संलग्न राहतो किंचितच ना...? आपलं आयुष्य जगताना काही जणांना असा पण एक प्रचित भास होत असेल का हो बघा ना- तेल संपलेल्या पणतीची वात वाढवून, फाटलेल्या पतंगाला ढील देऊन, सुकलेल्या ओढ्यात खड्डा खणून, सगळं करून झालं,यश काही येईना म्हणून नशिबाला डोष देत आपण आपलं आयुष्य जगत असतो काहीदा बोलायला वाईट वाटत ओ पण जगामध्ये इतकी मानस कमावली पण कुणाकडे २ मिनिटे बोलायला वेळ नाही आज मी थांबलो तर माझा काळ वाईट होईन म्हणून खोटी ऊर्मी अंगात आणून माणूस असा आत्मविश्वास घेऊन जगतोय ते पण सांगू का...- मी थांबणार नाही,थांबून चालणार नाही, अजुनही मुजलेल्या विहिरीवर मोट बांधायची आहे,संपलेल्या पारायणात टाळ वाजवायचे आहेत,रिकाम्या देवळाला फेर्‍या घालायच्या आहेत,एवढं सगळं करायचं आहे. म्हणून आपलं आयुष्य वेशीला टांगून घ्यायचं आणि कधीतरी आपणच विचार करत बसायचं व्यस्त व्यस्त व्यस्त झालोय... ! काहीच्या काहीच सुचत नाही... !
आम्हाला सुद्धा आता कळेना झालाय राव माणसाशी प्रेमानं वागावं का रागानं माणसांना आठवण काढून फोन केला तर इतकं बोलतात कि जगाची सगळी काम यांनाच दिलेत त्यांचं तर काय प्रत्येकाच्या घरातलं सुरवात पण असंच झालाय त्याला तर कोण काय करणार एका कुटुंबातलं (शिक्षीत) - एका बायको आणि नावाऱ्यातलं संभाषण साधारणतः - अरे सकाळी उठल्या उठल्या WhatsApp messages बघण्यापेक्षा पिल्लुला जरा ब्रश करवतोस का ? मी जरा चहाच बघते.” हल्ली आमची सकाळ ही  WhatsApp messages बघुनच होते आणि बहुदा आमच्यासारखीचअनेक जणांची सुद्धा होत  असावी.
        गडद काळोख्या रात्री जस आकाश ताऱ्यांनी गच्च भरलेल बघितल की मनाला तृप्ताता वाटते अगदी तशीच भावना जेव्हा आपला फोन messages नी तुडुंब भरलेला असतो तेव्हा दाटून येतात. मनात कुठेतरी आनंदच   झालेला  असतो. खरतर आपल्या कामाची अशी मोजकीच messages असतात..बाकी सगळी लग्नात आलेल्या साडीसारखी forwaded आणि कदाचित यापूर्वीही बर्‍याच वेळा आलेली .
हेच आणि इतकंच एका सुशिक्षित आणि चांगल्या व्यक्ती,महिला,युवक आणि युवतीच्या मतानुसार आयुष्य आहे. मग एखाद्याला वेळ द्यायचा आणि काढायचा म्हटलं तर कुठून येणार ? सांगा ना आहे का उत्तर...?
       हे पण खरं आहे जाता जाता सांगू वाटलं आणि माझ्या मते तुमच्या-आमच्या आयुष्यात येणार प्रत्येक नातं हे तुम्हाला काही ना काही देऊनच जात. फक्त तुम्ही त्यातून काय घेता . काय शिकता हे महत्वाचं. सहवासात येणारे सगळेच हे सोफेस्टीकेटेड , सुशिक्षित आणि सन्माननीय कुटुंबातील असतातच अस नाही किंबहुना अशा लोकांपेक्षा बहुतांशी वेळेला साधी सरळ पण माणुसकी असलेली लोकच तुम्हाला श्रीमंत करून जातात . म्हणून सर्वांनी व्यस्त राहा पण आपल्या या शब्दातली ताकद ओळखून त्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेळ काढायला शिका म्हणजे तुम्ही शिकलेल्याला अर्थ आहे. मग मला फक्त आणि फक्त Albert  Einstein  च्या ओळी  आठवल्या “I  fear  the  day technology will surpass our human interaction .The world will  have a generation of idiots . ”

     धन्यवाद...!

No comments:

Post a Comment