Wednesday, 2 December 2020

कोरोना : एक शिकवण !

 शिर्षक : कोरोना : एक शिकवण..!

[ गेली वर्षभर कोरोनाने थैमान घातलं आणि अक्षरशः प्रत्येकाच्या आयुष्यात नकोसा वाटणारा वर्ष म्हणून हिणवले जाणारे वर्ष म्हंटल तर चालेल. सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला ‘जिवंत राहणे’ हीच आपली प्राथमिकता आहे हे अधोरेखित करायला भाग पाडले आहे. साथीच्या प्रकारातील या विषाणूचा प्रादूर्भाव जगभरातील अनेक श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत होतोय. तस ह्या "जगणं" नावाच्या झटापटीत प्रत्येकाची गळचेपी होऊन बाजार भरला आहे पण बाजारात प्रत्येकाला किंमत मिळेना, जगणे अवघड आणि मरणे डाव्या हाताची मळ झाली आहे हे खरं. या संकटातही अहोरात्र झटलेल्या पोलीस आणि आरोग्य विभागाच्या तमाम योध्याना लेख समर्पित...करतो तसेच कोरोनाच्या काळात आपल्याला मानवी जीवनात मिळालेल्या शिकवण बद्दल लेख आपल्यासमोर सादर करतोय...]

देशात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. मात्र तरी देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. तसेच कोरोनाच्या युद्धात आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस, नर्स आपले कर्तव्य बजावत आहे. ‘भारताला कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावे लागेल आणि लॉकडाऊन हटवावा लागेल. याचे कारण लॉकडाऊन हटवला नाही तर कोरोनामुळे जेवढे मृत्यू होतील, त्यापेक्षा जास्त लोक उपासमार आणि कुपोषणामुळे मरतील,’ असं मत इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी यांनी व्यक्त केलं आहे. आजवर लॉकडाऊन म्हणून अनेकांच्या पोटाला चिमटा बसला अनेक उद्योग पासून ते अनेक व्यवसाय रसा-तळाला गेले आहेत. 

आज वर वर्ष भरत आलं तरी कोरोनाच्या भीतीने आणि संसर्गाने जी देश विदेश पातळीवर थैमान घातले आहे ते नक्कीच उभारून किंवा पडलेली खळगी भरून निघायला मात्र नक्की अनेक वर्षे लागतील यात आशंका नको. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या लोकांना विविध स्वरुपात मदत केली जात आहे. कोणी आर्थिक मदत तर कोणी अन्न धान्य, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करीत आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही बाधित होत आहेत. कोरोनाच्या काळात जास्तीत जास्त धावपळ न जीवाचं रान करून जे ह्या मानव जातीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला अर्थात डॉक्टर, नर्स आणि पोलीस प्रशासन हेच दैवत म्हणून उभे ठाकले. आज प्रत्येक गावात , देशात नाही जगात एकच प्रश्न सामान्य पासून ते असामान्य लोकांच्या समोर असलेला प्रश्न म्हणजे " कोरोना ". 

त्याबद्दल - 

समतोल बिघडला निसर्गाचा

मानवा कसा घातला रे घाव,

कोरोनाच्या या महामारीतून

देवा सुटकेचा आम्हा मार्ग दाव,

दाखविली अनेक तुझी रुपे देवा

आलास कोरोना योद्धे बनुनी,

डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी

प्रशासक, शेतकरी अन् गृहिणी,

एखाद्याच्या चुकीमुळे प्रत्येकजण

कोरोनाच्या विळख्यात अडकतो आहे,

या काळातही प्रत्येक कोरोना योद्धा

जिवाचं रान करुन लढतो आहे. 

... वरील संकलित उक्ती मुळे वाटून जात की नक्कीच जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पोलीस प्रशासनाने केलेलं योगदान आज नक्कीच चांगल्या आणि जिवाच्या बचावासाठीच ते योगदान नक्कीच नमूद करण्या इतपत श्रेष्ठ म्हणावं लागेल. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातला लाखो लोक मृत्यूमुखी पडले काही देशांची अर्थव्यवस्था खिळीखिळी करून टाकणारी प्रचंड मोठी महामारी भारतासारख्या देशालाही सळोकी पळो करून सोडलं आहे. भारताच्या राजकीय आणि केंद्रीय मंत्री महोदय यांच्या सावधानते मूळ आज भारतात त्याचा वेग कमी होत आहे. तसेच काहीशी परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाचे जगणे किंवा राहणीमान सुरळीत सुरू असताना कोरोनाच्या आगमनने सर्व काही बदलून गेले. तसेच त्याच्या ह्या संसर्गमुळे आपल्याला अनेक धडे शिकायला ही मिळालं. जसे की पाण्याचे प्रदूषण ही देखील एक मोठी समस्या आहे. मनुष्याने निसर्गाचं मोठं नुकसान केलंय. प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढले असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पण आता या सर्वात कोरोनाने काय शिकवले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचे उत्तर सोपं आहे; निसर्गाला त्रास दिला की तो तुम्हाला त्रास देतो आणि हीच महत्वाची शिकवण आहे की निसर्गाला गृहीत धरू नये. निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही असे म्हणतात आणि ते तंतोतंत खरे आहे आणि म्हणूनच निसर्गाची काळजी घ्या हा सर्वात मोठा धडा कोरोनाच्या या संकटाने आपल्याला शिकवला आहे. 

     नोकरी आणि पोटापाण्यासाठीच्या धावपळीने जीवनशैली अतिशय धकाधकीचे बनलंय आणि त्यामुळे घरच्यांना वेळ देणे, त्यांच्याशी गप्पा मारणे देखील दुर्मिळ झाले आहे. खरंतर घरच्या मंडळींना वेळ देणे अतिशय महत्वाचे असते. आई वडिलांचा एकमेकांशी आणि मुलांशी संवाद, घरातील ज्येष्ठ लोकांशी संवाद या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोरोनामुळे लोक व्यथित असले तरी कोरोनाने सर्वांना घरात बसायला लावले आहे आणि याचमुळे घरच्यांना भरपूर वेळ देणे शक्य झाले आहे. काही घरांमध्ये वाद होत आहेत पण अनेक नाती देखील मजबूत होत आहेत. कोरोनाने आपल्या सर्वांनाच नात्यांचे महत्व शिकवले आहे. म्हणून नाती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्यक्ष संवाद पासून ते प्रत्यक्ष गाठी भेटी झाल्या पाहिजेत ही आमूलाग्र बदल घडवणारे बाळकडू ह्या कोरोनाने आपल्याला दिल. तसेच आपल्याला म्हणता येईल स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात कचऱ्याचे प्रमाणात अतिशय मोठे आहेत पण त्यासाठी होणाऱ्या उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहेत. स्वच्छता असल्यास कोणताही आजार आपल्या जवळ येत नाही हे तर सर्वांनाच माहितीये. पण तरीही सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची ऍलर्जी असल्याचे दिसून येत आहे. कोणताही आजार पसरण्यासाठी अस्वछता अतिशय पोषक आहे. कोरोनाने लोकांना सारखे हात धुण्यास शिकवले. मास्क देखील लोक घालू लागले आहेत. सर्वजण लॉकडाऊनमुळे घरी असल्याने संपूर्ण निसर्ग स्वछ होतोय. कचऱ्याचे प्रमाण कमी झालंय. थोडक्यात काय कोरोनाने सर्वांना स्वच्छतेची शिस्त लावली असे म्हणल्यास काही वावगे ठरणार नाही. हीच सवय आपण यापुढेही अशीच पाळली पाहिजे. विचित्र जीवनशैली, वेळी-अवेळी खाणे अशा अनेक गोष्टींमुळे सध्या देशातील लोकांच्या तब्येतीचा स्तर खालावला आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ या सगळ्या गोष्टींमुळे आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या, मधुमेह, ब्लड प्रेशर यासारखे सारखे आजार असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले लक्ष्य केले आहे.

            कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीरो गप्रतिकारक शक्ती चांगलीच असावी लागते. म्हणजे कोरोनाने सर्वांना तब्येतीचं महत्व शिकवलं. तब्येतीची काळजी घेणे किती महत्वाचे आहे हे देखील या विषाणूने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. मग आयुष्यभर तब्येतीची काळजी घेतल्यास सर्व प्रकारच्या व्याधी आणि रोगांपासून दूर राहण्यास आपण सक्षम होऊ शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे निसर्गाचे चक्र सुधारलं आहे. प्रदूषणात मोठी घट झाली असून वन्य जीवन देखील आनंदी असल्याचे अनेक ठिकाणी आपण त्यांना पाहिलंय. वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीवप्राणी असो अथवा वन्यप्राणी सर्वच जीवनचक्राचा एक आमूलाग्र आणि अतिशय महत्वाचा भाग आहेत. त्यांची संख्या कमी झाल्यास जीवनाचा समतोल बिघडतो आणि म्हणूनच त्यांच्यावर प्रेम करणे आणि त्यांची काळजी घेणे देखील अतिशय महत्वाचे आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात प्राण्यांच्या कत्तलीमध्ये देखील घट झाल्याचे दिसून येत आहे. सर्वांनी आनंदाने एकमेकांची काळजी घेऊन एकत्र राहावे अशीच शिकवण कोरोना सर्वांना देत आहे. कोरोनाचे संकट मोठे असले तरी आपण सर्वांनी काळजी घेतल्यास त्यावर नक्कीच मात करू शकतो. कोणताही आजार असो तो नेहमीच सगळं हिरावून घेत नाही तर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी देऊन देखील जातो. अनेक वेळेस आपल्याला अनेक गोष्टींबद्दल पूर्वकल्पना देतो.अनेक गोष्टी शिकवून देखील जातो.

    ... प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहुयात आणि कोरोनाने आपल्याला जे धडे अथवा शिकवण दिली आहे त्यावर गांभीर्याने विचार करून ती अमलात आणून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखूयात.


                             © धन्यवाद ( लेखन : पत्रकार एन.के. ) 

                             © मोबाईल : +९१८८०६६०५८५२

Tuesday, 15 September 2020

मगचं लोकांना चुकीचं ठरवा !

 शिर्षक : आपली झोळी तपासा ; मगच लोकांना चुकीचं ठरवा !

लेखन - पत्रकार एन.के. ( संकेत टाइम्स : ८८०६६०५८५२ )

           [ नमस्कार वाचक हो, अनेकदा खुप काही लिखाण करून आपल्या समोर सादर करावे वाटते परंतु वेळे अभावी ; असो आजच्या वरील शीर्षक प्रमाणे आपल्या भोवताल असणार हे सुंदर जग, अनेकांना अनुभवायला येत का नाही माहीत पण म्हणतात की जग सुंदर आहे, आपल्या दैनंदिन कामात आपल्याला सुखाची छाया देणारी माणस, वस्तू, प्राणी हेच चांगले अन्यथा बाकीच्याशी देणं घेणं नाही म्हणून जीवन जगणाऱ्या पण जीवनावर कंटाळा करून नावडती म्हणून जगण्याला हिणावणऱ्या अशा प्रत्येकासाठी लिहतो आहे.. ]


.... ‘‘मी पणाचा गर्व मात्र नाशाकडे आणि ऱ्हासाकडे नेल्याशिवाय राहात नाही.’’ कारण नियती कधीच कुणाला माफ करत नाही. म्हणूनच चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. तुम्ही जे पेराल तेच उगवेल हे वास्तव आहे." ‘जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर’ हे प्रल्हाद शिंदे यांच्या पहाडी आवाजातले गाणे बालपणापासून ऐकत आलोय, पण त्याचा मथितार्थ मोठा झाल्यावर समजू लागला. ‘‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर’’ हे का सांगितले आहे ते सदानकदा, पावलोपावली अनुभवास येते. माणसाचे कर्म चांगले असेल, तर निश्चितच त्याचे न मागता फळही चांगले मिळते, असा त्याचा बोध आहे. तुमच्या आचरणातून तुम्ही स्वत:ला सिद्ध कराल ते भगवंताला प्रिय असते. स्वामी समर्थानी सांगितले आहे की, ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे’ ज्या ज्या वेळी तुला संकटाशी सामना करावा लागेल. त्या त्या वेळी मी तुझ्या हाकेला धावून येईन, मात्र तू प्रयत्न कर. स्वत:च्या स्वभावातून आचरणातून समाजसेवा घडली पाहिजे. भुकेल्याची भूक आपली वाटून तुम्हाला ज्यावेळी दयेचा पाझर फुटेल तेव्हाच तुम्ही माणूस म्हणून जगण्याचे तुम्हाला समाधान मिळेल. अहंकार, गर्व कशासाठी? शाश्वत तर काहीच नाही, मग गरीब-श्रीमंत या भेदभावात माणसाला माणूस हरवून का बसला आहे.  आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तुम्हाला सत्याच्या वाटेने जाताना तुमचा नि:स्वार्थीपणाच कामाला येईल. चांगले कर्म केले तर कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. दिवसभर किंवा आयुष्यभर भक्तीत डुंबून जायची गरज नाही. घर, प्रपंच सोडून भक्ती करायची गरज नाही. जगात अनेक अशी उदाहरणे आहेत जे आपल्याला स्वार्थ म्हणजे काय अशी तात्पर्य देऊन जातात. माणूस जगतो मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आपल्या जवळच्या माणसाच्या स्वार्थासाठी हे नक्की क्वचित काही जण असतात जी ह्या समाजासाठी किंवा पुढच्या गरजुच्या हातची भूक,तहान, भागवत असतात. पण जसे ही क्वचित असतात ना तसे आपले उपकार पण क्वचित असतात कारण आपली काम व्हावी म्हणून प्रत्येकाला आपण उपकाराच्या सौम्य जाळ्यात घेतो पण त्या मागे खूप मोठा स्वार्थ असतो एवढं सगळं करत असताना नमूद करावे असे वाटते जगासमोर आज कोरोना सारख महा संकट समोर असताना आजही माणूस आपल्या जिवाच्या आकांताने स्वतःसाठी स्वतःच्या उपजीविका किंवा स्वतःच्या चांगुलपणाची लख्तरेची पान वर वर पुसण्यात अव्वल असतो. आपल्या जगण्याच्या एक शैलीत प्रत्येक माणसाची सवय म्हणतो मी तर की एखाद काम असत न त्या क्षेत्रातील त्या माणसाच्या वतीने काम होणार असेल तर त्याला दलाल रुपात बघून गोड प्रवृत्ती बनवून काम करून घेतो अनपेक्षित काम आल्याने पुढचा केला किंवा वेळ नसल्याने विलंब झालं तर तो माणूस चुकीचा किंवा वाईट ठरवणारे आपण जहागीरदार कोण ?     

       आहे का उत्तर नाही ना ? नसणार आहे कारण ही प्रवृत्ती प्रत्येक माणसाच्या अंगात भिनली आहे. खूपदा अस होत आपल्याला कॉल येतात संपर्क होतो खुप दिवसांनी झालेली संपर्क ही काही ना काही स्वार्थ घेऊन आलेली असतात ( काही वगळता ) त्यात तू कसा मी कसा, छान -बरेची मुक्ताफळे टाकून झाली की "माझं एक काम होतं" मग सुरू होते बोअरिंग बीजगणित पाढा ! हे बंद झालं पाहिजे यासाठी माझं मत आहे की आपण कुणाच्या मदतीला किती येतो न तेही निस्वार्थ तेवढंच आपल्याला क्विक वाला फीडबॅक मिळणार  आहे हे कदापी विसरू नका ! आपल्या झोळीत लोकांना द्यायला काय असेल नसेल तरच त्यावरून आपल्या पदरात पडणाऱ्या चांगल्या वाईटची लिस्ट ठरत असते. म्हणून एखाद्या माणसाच्या बद्दल बर वाईट मत प्रकट करत असताना विचार करा. स्वार्थ असुद्या नक्की पण त्याची प्रदर्शन मांडू नका, संयम न नात्याची पारख करा, टेहाळणी करा, नात्याला गालबोट किंवा हर्ट करण्याआधी शंभर वेळा विचार करा आणि मगच एखाद्या बद्दल विचार करा न मग वागा. भिंतीला कान असतात नक्की पण कानाला भिंत जवळ असते नसते पण पुढच्या व्यक्तीच्या मनातली तुमच्या बद्दलची प्रेमळ भिंतीची ती वीट ढासळू नये एवढी काळजी घ्या मात्र नक्की. मागील लेखातील एक संदर्भ घेतो - 


"सुन्दर चेहरा थोड़े समय ही याद रहता है, पर सुन्दर व्यवहार जीवन भर याद रहता है।"

बस यही है जीवन का गुरु मंत्र... अपने चेहरे और शरीर की सुंदरता से ज़्यादा अपने व्यवहार की सुंदरता पर ध्यान दें.. जीवन अपने लिए आनंददायक और दूसरों के लिए अविस्मरणीय प्रेरणादायक बन जाएगा..!

   धन्यवाद !

Friday, 7 August 2020

मिडिया आणि समाज

 शिर्षक : मीडिया आणि समाज : एक विदारक सत्य !

लेखन : पत्रकार एन.के.

       [ _सारांश : गेले ७-८ दिवसापासून अनेक विषय डोळ्यासमोर तरळत होते ते म्हणजे कोरोना काळात लिहावं आज वेळ मिळाला व्यक्त होतोय प्रतिक्रिया नक्की असावी ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूज चॅनेल किंवा काही डिजिटल मीडियावर पाहायचं झालं तर कोरोनावर कानउघाडणी धडाधड येऊन पडायची अन पडत ही आहेच, या विरोधार्थी म्हंटल विविध विषय होते यात अनेक शेतकरी, कोरोनाच्या काळात घाला घातलेले अनेक धंदे, संसार, अनेक नियोजीत कामे, योजना, असे प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक एक ना एक असे विषय जे संकटात होते आणि आहेत यावर कुणाचं किती लक्ष याकडे एक कटाक्ष टाकल तर तळ पायाची आग मस्तकात नक्कीच जाते, शेवटी आज मनातल उतरवत आहे..._ ]

            

        आपण राहतो त्या समाजाच्या एका कोपऱ्यात जर एखादी भयानक गोष्ट घडली की वाऱ्यासारखी पसरणारी साधने म्हंटली की तडक डोळ्यासमोर येतात ती अमुक तमुक न्यूज चॅनेल, देशाच्या, राज्याच्या , जिल्ह्याच्या एवढंच नाही तर तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या गाव, गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडी आपल्या जवळ क्षणात पोहचवणारी एक वहिनी म्हणजे मीडिया, आज मीडिया आणि डिजिटल वर अनेक कामे मग ती आर्थिक असतील, किंवा संभोधन असेल किंवा मग कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही सौम्य किंवा मोठी कामे आज मिडियामार्फ़त होतात म्हणजेच की मिडियाचे महत्व आज प्रिंट मीडिया पेक्षा जास्त आहे. पण आज मीडियाचा इतका अतिरेक आज पाहायला मिळतो आहे की कोणत्या बातम्या असाव्यात किंवा कोणते संदर्भ घेऊन आपल्या समोर व्यक्त व्हायला हवं त्याच सोयर सुतक आहे का भला मोठा प्रश्न चिन्ह आज सर्वांसमोर उभा राहिला आहे. मानवी संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे माणसाने केलेली स्वतःची समूह रचना. प्रत्येक माणूस हा मन, मेंदू आणि विचार यांनी दुसऱ्याशी जोडला गेला आहे. आपण दररोजचे जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडत जाऊन आपण सवेंदनशील होतो. झालेला बदल आणि महत्त्वाचे म्हणजे विचारांची वळणधार नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगल्या आणि एक वाईट जाग्यावर नेऊन ठेवतो हे नक्की. 'बदल' हा निसर्गाचा नियम आहे. गेल्या काही वर्षापासून माणसाच्या आयुष्यात खूपच आमूलाग्र बदल घडून आले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेडिओ, साठ सत्तर च्या दशकात दूरदर्शन, ऐंशीच्या दशकात संगणक, नव्वदच्या दशकात केबल नेटवर्क, मोबाईल आणि एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या माध्यमातून, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, ब्लॉग अशी विविध माध्यमे माणसांच्या हातात आली. तंत्रज्ञान क्षेत्रात झालेले हे बदल तुमच्या माझ्या आयुष्यात आमूलाग्र अश्या पद्धतीचेच आहेत. 1991 ला भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यांनतर संपूर्ण जग हीच भारतासाठी एक बाजारपेठ निर्माण झाली. तशी आज या सर्व सोशल मीडियाच्या प्रगतीने संपूर्ण जग हे तुमच्या एका क्लीक वर संपर्कात आले आहे. आज शेतीपासून उद्योगधंद्यापर्यंत, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, विज्ञापासून शिक्षणापर्यंत सगळीच क्षेत्रे सोशल मीडियाच्या कल्पनाविष्काराने बहरली आहेत. तरुणाईसह इतर वर्गाची सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे. या तरुणाईला सोशल मीडिया च्या माध्यमातून वैचारिक आणि तांत्रिक पाया असणारा तत्वांचा एक गट आहे. ज्याद्वारे आपले विचार आपले मत समाजसमोर बिनधास्तपणे मांडता येते. तसेच आपल्या विचारांची देवाण घेवाण करता येते. दररोज विचारांच्या माध्यमातून नवीन नवीन मित्र भेटत राहतात. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुप हे समाजाच्या विविध प्रश्नांवर समाजाची मते जाणून घेऊन त्यावरती उपाययोजना करण्याचे काम समाजात करत असताना दिसत आहेत. दररोजच्या धकाधकीच्या आणि धावत्या जीवन शैलीमुळे समाजमनावर आलेली मरगळ काहीवेळा विनोदाच्या माध्यमातून दूर होण्यासही मदत होते.   

           हा एक भाग झाला आणि आज ऑनलाइन शाळा किंवा अनेक अशा शालेय गोष्टीत अनेकांचा वेळ आणि प्रवास वाचला नक्की आहे पण कधी कधी नाहक गोष्टीवर मीडिया जास्त लक्ष देते या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंब उपाशी, अनेक रोजगार ठप्प, अनेक लहान उद्योगांवर उपासमारीची वेळ आली पण त्यावर कधी बातमी गडद होताना दिसत नाही. म्हणून कोणत्या डिजिटल दुनियेवर विश्वास ठेवावा हेच कळत नाही. सध्य परिस्थितीत पाहता मोबाईल वर सगळ्या गोष्टी शक्य आहेत मग त्यात करमणूक आलं, त्यात वृत्त वाहिनी आल्या तस तसे प्रिंट मीडिया लोप पावत जाते की काय अशी भीती वाटू लागली आहे. गेले अनेक दिवस आपण पाहिलं की सुशांत नामक अभिनेत्याच्या आत्महत्तेनंतर मीडिया ने सदर प्रकरण इतके उचलून धरलं की गरज नसलेली गोष्ट अतिरेक करून सोडलं त्या बदल्यात कधी शेतकरी, कधी बेरोजगारी, कधी सामान्य माणसाच्या प्रश्नांना घेऊन लढाई लढली जात नाही ही खंतच म्हणावी लागेल. अनेक असे प्रश्न आहेत, कुटुंब आणि गाव आणि नगण्य प्रकरणे आहेत पण कधी मीडिया त्याला गंभीरपणे घेत नाही हे एक प्रकारचे दुर्दैवच म्हणावं लागेल. 

अगदी सकारात्मक दृष्ट्या विचार करता सोशल मीडियाने वैयक्तिक आयुष्य मनमोकळे केले आहे. असे असले तरी काही दुष्परिणामही आपल्याला नाकारून चालणार नाहीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापर वाढल्यास त्याचे पडसाद नकारात्मकच अधिक पहायला मिळतात. सोशल मीडियाच्या अतिवापराने वैयक्तिक आयुष्यात कोटुंबिक जीवन दुःखाच्या छायेत गेल्याच्या घटनाही आपल्याला पाहायला मिळतील. मानसिक विकृतीतून अनेक सायबर गुन्हेगारांचा जन्म झाला आहे. आजची तरुण पिढी दहा दहा तास फक्त फेसबुक, व्हॉट्सअप वर वैयक्तिक संभाषणासाठी स्वःतला गुंतवून घेते. यामधून अनेक आजारांना स्वतःहून आमंत्रण देण्याचा हा प्रकार दिसून येतो. अनेक मुलींना वैयक्तिक अकाउंट वरून ब्लॅकमेलिंग केल्याच्या हि घटना आपल्यासमोर आहेत.. त्या आहेतच असे नाहीतर त्या दररोज वाढतच आहेत हि तुमची माझी बोचरी खंत आहे. शेवटी तीक्ष्ण हत्याराने जशी शस्त्रक्रिया करून एखाद्याचे प्राण वाचविले जातात तसेच त्याच हत्याराच्या चुकीच्या पद्धतीच्या वापराने एखाद्याचे प्राणही घेतले जाऊ शकतात . त्यामुळे सोशल मीडियाबरोबर आनंद घेत असताना आपल्या इतर मित्रांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी हि आपल्या सारख्या सुशिक्षित समाजाने घ्यायला हवी हीच एक माफक अपेक्षा...!

धन्यवाद.


मोबाईल : +९१८८०६६०५८५२

Sunday, 19 July 2020

शिकवण चुकांची !!

शिर्षक : शिकण्याचं खरं व्यासपीठ : चूक (FAULT) !!

लेखन : एन.के. ( पत्रकार ; मो.- 8806605852 )

[ नमस्कार ! खुप दिवस नंतर विषय घेऊन येतो आहे, मानवाने आज पर्यंत अनेक जीवनाची चढ उतार पाहिले, अनेक सुख - दुःखाची दारे ठोठावली त्यातून अनेक गोष्टी पोळल्या ही असतील आणि काही आठवणींचा कप्पा गडद ही केले असतील ; आणि यावरून माणसाने जीवन प्रवासात काही अडचणी चुका मधून ही उद्भवल्या असतीलच आणि एक लक्षात ठेवा, चुकणे हा माणसाचा स्थाई स्वभावच बनला आहे, कारण जो निर्णय घेतो त्याच्याच हातून चुक होते जो निर्णयच घेत नाही त्याच्याकडून चूक होण्याची शक्यता नसतेच, पण एकदा केलेली चुक परत न करणे यालाच शहाणपण असे म्हणतात. असाच एक सुंदर विषय वर लेखन तुमच्यासाठी... ]

आजच्या टॉपिकवर येतो, चूक करणे किंवा होणे हे माणूसपणाचे लक्षण असले तरी चुकांची पुनरावृत्ती न करणे आणि केलेल्या चुकांच्या परिणामांची जबाबदारी उचलणे हे गुणी माणसाचे लक्षण आहे. बरोबर आहे आज काल माणूस चुका करतो पण त्यावर भाष्य किंवा ते स्वीकारून न घेता त्यावर पडदा टाकण्याचाच जास्त वेळा प्रयत्न होतो. असे न करता झालेल्या चुका पदरात घ्या आणि स्वछंद मनाने आत्मसात करून त्यावर मान्यताप्राप्त बनायला शिका.
         तसेच प्रत्येक माणसांत गुण आणि दोष हे असतातच. कदाचित एकाकडे गुण जास्त असतील तर दुसऱ्यात ते कमी प्रमाणात असतील. काहींचे दोष डोळ्यावर येतील तर काहींचे दोष छुपे राहतील. हे सगळं डबोलं अंगावर घेऊनच आपण जगत असतो. त्यामुळे काही फायदे होतात तर काही तोटे, पण सर्व फायदे-तोटे भोगत जगणं हा आपला स्वभावधर्म होऊन बसतो आणि आपण आपल्याकडे शांतपणे बघतच नाही. एखादवेळेस आजार झाला, अपघात झाला तर नाइलाजास्तव का होईना, आपल्या सवयी, जीवनशैली यात थोडा बदल करतो. पण तेसुद्धा अगदी मनापासून केलेलं नसतं. अगदी अस की काही बाबतीत जगण्याच्या प्रत्येक वाटेवर, काळात, अलीकडे किंवा आपल्या बोली भाषेतल्या पलीकडे चुका सुधारून घेऊन त्या उलट चांगल्या सवयीना आवर्जून प्राधान्य द्या. २. अस कधी कधी स्वतःमध्ये डोकावून बघा ना वाटून जातं की, दुनियेतले कोटय़वधी लोक असंच जगत असतील जसे मागील पान उलटून त्याच वाटेने नवा दिवस व्यतीत करीत असतात. यालाच आम माणसाचं जीवन म्हणतात. जर उगवणारा प्रत्येक दिवस नवा असेल तर जे आतापर्यंत करत आलो त्यात चांगला बदल व्हावा असे अगदी थोडय़ा माणसांना का वाटते? जगात चांगला माणूस म्हणून जगणे थोडय़ा माणसांना का बरं जमते? आणि आपण बहुसंख्य जसे आहोत तसेच वर्षांनुवर्षे का जगत राहतो. का रुटीनमध्ये जगणं हीच आपण आपली नियती मानतो? म्हणजेच एक प्रकारे आपल्या आयुष्याचे दोर नियतीच्या हातात देऊन तिच्या तालावर पावले टाकत राहतो...? म्हणून कधीही खचून न जाता नशिबाच्या कागदाची वाक्ये न विचारात घेता स्वतःच्या मनाची आर्त हाक ओळखायला शिका. ‘मन’ हे असे वाहन आहे जे घरबसल्या आपल्याला जगाची सैर घडवते.. सगळीकडे फिरवून आणते..मन अर्थात आपल्या शरीराचा बॉस असतो. जो जस म्हणतो तस करावं लागतं. मन तस खुप मोठ असतं. सगळ्यांची चिंता वहाते.. कधी कधी उदास असते तर कधी आनंदी असते..एंजल आणि सैतान हे मनाचे दोन रहिवासी आपल्याला कधी सुंदर विचारधारा देतात तर कधी वाईट विचारधारा..एक अस ही विचार करून बघा की मन थकत नाही.. सतत उंडारत राहतं मनाचे काम दिवसरात्र चालू असतं. इतकं की कधी कधी आपल्याला कंटाळा येतो. कामात असतानाही मन शांत बसू देत नाही.
जाता जाता एक शब्दांकन असे की माझे गुरुवर्य माझ्या कामाच्या ठिकाणी असणारे एक वरिष्ठ अधिकारी मा. निशांत सर यांनी या विषय बद्दल आपल्या मार्गदर्शन मार्फत खूप छान बोध दिला त्यांच्या आत्मविश्वास भरे संभाषण नंतर हा विषय ठरला माझा त्यांनी आपल्या माहितीत असे विशद झाले की "माणसाने चुक करू नये, आणि जर अनभिज्ञ एखादी चूक झालीच तर त्याची जबाबदारी किंबहुना मान्य करायला स्वीकारा. तसच झालेल्या चुकामधून खूप शिकण्यासारखं असत ते शिका आणि सुंदर आयुष्याला गोंडस बनवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाबतीत चुका घडतात चुका कधी त्रासदायक असतात पण क्षणात गोंधळून न जाता शांत बसून वेळ काढा आणि पुन्हा चूक का झाली यावर विचार न करता चूक होणार नाही याकडे एक सुंदर विचार प्रेरित करून जोमाने कामाला लागा."

धन्यवाद ! 

Wednesday, 10 June 2020

नाती : रस्ते आणि जिवन...!

शिर्षक :- नाती अशीच असतात...!🙏🏻

     
         
       जगाच्या पाठीवर अनेक लोक भेटतात, करतात, मैत्रीच्या आणि आपुलकीच्या नात्यावर भुरळ पडेल अशी अनेक नाती बनतात सत्य असत्यच्या खेळा सुरू होतात यात ही अनेक नाती अशी अदृश्य असतात जे प्रेमाच्या प्रवाहात वाहिलेली असतात. स्वच्छ आणि सुंदर नाती कधीही बाधत नाहीत कारण अशी नाती कधी प्रेम नावाच्या पंखाच्या असेने हरत नाहीत तर उलट अशी नाती मैत्रीला एक किनार मानून मार्गक्रमण करत राहतात. कधी कधी नाती अशी अवजड वाटतात की आपल्यात निर्माण झालेला त्यांच्या बद्दलचा कणव कमी व्हावी आणि संपर्क नात्यातला संपवावे आणि निस्वार्थ भावनेने एकवटावे. नाती असतातच अशी लिहताना भान राहत नाही की सकाळ ते संध्याकाळ पर्यंत प्रत्येक नात वेगळं अर्थ, समज, वेगळी तमा, वेगळं आकर्षण अर्थात वेगळेपण असणाऱ्या असतात. पण अशा नात्यात एक प्राजळ मनाने आपल्या साठी केलेली प्रार्थनिय नाती असतात.
अशा नात्यात कधी तर प्रेम, विरह, सहवास पासून ते अगदी जिवलग पाखरांच्या गुफ्त-गु असतात. एखाद नात सुंदर आणि सजवून धजवून निर्माण केलं जातं त्याला प्रेमाचा वास लागतो अशा वेळी प्रत्येक शब्द आणि प्रत्येक बोली भाषा ही सावरून जगणं आणि व्यक्त होण्याला सुरवात होते. कधी कधी वाटून जात की अशी नाती जुंपली जन्माला की वाईट किंवा कोणत्या तरी लहानशा चुकीने दुरावली जाऊ नयेत म्हणून कधी प्रपोज केला जात नाही कारण मैत्री मलीन होऊ नये यासाठी धडपड असते. खरं तर मला तरी वाटतो.की मैत्री मधले प्रेम जा​स्त महत्वाचं आहे .कारण की आपल्याला जर अचानक एखादं संकट आले तर आपण एकटेच काही करू शकत नाही .जर आपण अगोदरच जर मैत्री करून ठेवली तर ती मैत्री आपल्याला आपल्यावर जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा ही मैत्री आपल्याला साथ देत असते. असं पण नाही की प्रेमा मधली मैत्री चांगली नाही ते पण ते पण एक महत्वाची मैत्री आहे. परंतु त्यांचा पेक्षा जास्त महत्वाची म्हणजे मैत्री. व्यवहार आणि मैत्री या दोहोंपैकी काहीच निवडु नका...
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा...
"व्यवहारात मैत्री असावी पण मैत्रीत व्यवहार नसावा...!"
व्यवहार करताना मैत्री सर्वांशी असावी...पण व्यवहारात भोळे पणा...सालस दाखवले तर जवळील व्यक्ति सुद्धा आपला वापर करेल...म्हणून पूर्ण व्यवहारीकच रहावे...
मैत्रीत व्यवहार केल्यास एखाद्या व्यक्तीचा करार करत आहोत असे काहीतरी जाणवेल...म्हणून मैत्री आणि व्यवहार दोन्ही असावे पण दोन्हीही आपापल्या ठिकाणी ठेवून पुढे जात रहायचे...! मैत्रीणीला मैत्रीण पणा जिवंत ठेऊन आज सांगतो की, होय तु माझी आवडती मैत्रीण असल्यामुळे मी तुझ्यावर मनापासून प्रेम करीत होतो. परंतु जर माझं प्रेम तुला मान्य नसेल तर माझी काहीच हरकत नाही. यासाठी मैत्री तोडण्याची गरज नाही. मैत्री आणि प्रेम ह्या समांतर प्रक्रीया असून मित्र म्हणून मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन याची खात्री मी आज तुला देतो .मैत्रीत प्रेम हे असतेच त्याशिवाय जर प्रेमच नसेल तर ती टिकणार तरी कशी हो ना , मैत्री म्हणजेच जिवापाड प्रेम हे आज समजलं न आज पासून प्रेमाची सांगड कमी घालू शकतो हे पक्के केलं आहे. माझ्या मते प्रेमाचा अर्थ प्रेमाची मागणी असा लावून कदाचित बोलणे बंद केले असेल तर माझे प्रेम हे निरपेक्ष मैत्रीचे नात्यातील प्रेम असून भविष्यात तीला या मैत्रीतील प्रेमामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खात्री मी आज देतो.
जेव्हा आठवणींचा हात साेडायला मन तयार नसतं तेव्हा समजून जावं त्याने पुढचा प्रवास नाकारलाय. अट्टाहासाने त्यात आभाळाची आेढ निर्माण करणं टाळावं कारण कितीही प्रयत्न केला तरी ते आभाळाच्या इंद्रधनुष्यात नाही तर मातीत रुजलेल्या इवल्याशा अंकुरात गुंतलेलं असतं,रमलेलं असतं..आणि जाे एकदा मातीशी जाेडला गेला ताे तिथेच विसावला.... अनेकदा काही माणसं जगाच्या दृष्टीने एकाच वळणावर थांबलेली असतात पण खरं सांगायचं तर त्यांचा स्वतःपुरता,स्वतःसाठीचा प्रवास हा तिथेच संपलेला असताे...अजून काही मिळविण्याच्या लालसेपेक्षा अशीच आठवणींची पाऊलवाट चालत चालत जीवनाचा प्रवास संपवणं त्यांना जास्त भावतं..असं जगण्याचं वेड याेग्य की अयाेग्य हा प्रश्न अनुत्तरीत राहिलेला बरा..!!

लेखन - पत्रकार एन.के.
     मोबाईल - ( ८८०६६०५८५२ )

Sunday, 7 June 2020

बायको... एक जीवनसाथी !!

शिर्षक - बायको : त्यागाची मशाल, घर संस्कृतीचा कणा...!

लेखन - पत्रकार एन.के. ( 8806605852)

      ... [ स्त्री बद्दल खुपदा लिहलं, त्याच्या परिस्थितीबद्दल किंवा अनपेक्षित तिच्या जडण घडण बाबत काहीस लिहलं मी नक्कीच पण 'बायको' नामक असणाऱ्या त्यागाच्या रणरागिणी बद्दल आज काही शब्दांकन करण्याचा मूड होता, प्रत्येक घरात एक जोडपं असतं, प्रत्येक  पुरुषाच्या आयुष्यात ; जिवनात बायको नावाचं एक चाक असत. हे चाक नवरा, मुल-बाळ, संसार, संस्कृती, वडीलधाऱ्या पासून प्रत्येकाच्या सुख: दुखात स्वतः कडे दुर्लक्ष करून घरासाठी त्याग प्रतिमा स्वतः मध्ये जागृत करून संस्कारी रुळावर कायम झटणारी रणरागिणी बद्दल आज चार शब्द विशद करतोय. विवाहित, अविवाहित अशा आणि बायको बद्दल वाचनिय मन असणाऱ्या सर्वांसाठी आजचा हा लेख अर्पण करत आहे. ]
                           

      नवरा बायको, म्हणतात ना एका संसार रुपी रथाची दोन चाके आहेत. खरंच आहे ते. नविन लग्न झाल्यावरचा तो हवाहवासा वाटणारा एकमेकांचा प्रेमळ सहवास. त्याने केलेलं तिचं कोतुक, मग ते जेवण बनवण्यावरुन असो किंवा तिच्या दिसण्यावरुन. त्यावर तिचं लाजणं. प्रत्येक गोष्टीचा दोघांचा पहिला अनुभव न विसरता येणारा. किती गोड असतात ते दिवस. या नात्यात वेगळाच गोडवा असतो. नविन घरात तोच एक अगदी जवळचा, हक्काचा वाटतो. आयुष्यात त्याच्या असल्यानं किती सुरक्षित वाटत असतं. तिचं सगळं विश्व त्याच्या अवतीभवती असतं. एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी समजून घेणं, त्यात साम्य असले तर होणारा तो आनंद. जीवनातील सुंदर अनुभव असतो तो.
       'ही बायको नसती तर'  ह्या विषयावर निबंध लिहायची वेळ आली तर कदाचित शंभर पानी वही पण कमी पडेल तुम्हाला. खरंच खूप काही लिहावं लागेल हो. हीच्याशीच लग्न जमवण्यासाठी केलेली खटपट, लग्न जमल्यानंतरच्या भेटी गाठी, तिचा रागवा रुसवा, लाडाने तिची केलेली मनधरणी, लग्नासाठी तिच्या आवडी निवडी पाहून केली खरेदी, तिच्या येण्यासाठी आतुरलेले तुमचे घर, तिला आवडणाऱ्या रंगसंगतीचे पडदे, तुमच्या बजेट च्या पलीकडे जाऊनहि निवडलेले तिच्या आवडीचे हनिमून डेस्टिनेशन हे सगळं नक्कीच आठवेल बघा. घराची जमवाजमव करताना तिची पसंद, आपल्या घरच्यांना लावलेला लळा, आपलया मित्रमंडळींच्या आग्रहाखातर तिने बनवलेल्या काही खास पाककृती, अगदी तुमच्या कपड्यांमध्ये, केसांच्या ठेवणीमध्ये झालेला फरक, तुमच्या खाण्यापिण्याचे सांभाळलेले चोचले हे तर नोंदवावे लागतीलच त्या वहीत. कामावरून आल्यानंतर तुमच्या कानात सांगितलेली  ती गोड़ बातमी,  तुमच्या घरात येणाऱ्या  नवीन पाहुण्यासाठी केलेली जय्यत ती तयारी आणि तो आल्यानंतर त्याच्याकडे  पाहणारी तिची कैवल्यपूर्ण नजर, ते बाळ मोठ होत असताना त्याच्याकडे वटारलेले डोळे आणि तुमच्या त्या राजपुत्राने मिळवलेल्या भव्य यशानंतर तिच्या डोळ्यातले ते कृतार्थ भाव पण तर लिहावे लागतील त्या निबंधात. प्रपंच वाढताना केलेल्या परिश्रमांची आणि तडजोडींची मोजदाद तर ठेवलीच असेल तुम्ही .. नवीन घराच्या साठी दागिने दिले असतील तिने डोळ्यातले पाणी लपवत, लेकाला अमेरिकेला पाठवताना राहिल्या असतील अनेक पैठण्या दुकानाच्या शोकेसमध्येच, तिच्या आईसाठी नसेल पण तिच्या रक्ताचं नातं नसलेल्या तुमच्या आईसाठी तर नक्कीच जागली असेल अनेक रात्री हॉस्पिटलच्या बाकड्यावर... जागा आहे ना वहीत ..खूप लिहावं लागेल अजून. हळूहळू जबाबदारी दिसू लागते. एकमेकांच्या सवयी आवडेलच याची खात्री नसते, मग सुरू होते तू तू मी मी पण तरीही तू आणि मी. एकमेकांकडून नकळत अपेक्षा वाढतात, पूर्ण होत नसेल तर चिडचिड होते. पण प्रेम मात्र कमी होत नसते. दोघांच्या भांडणात, रुसवा फुगवा दूर करण्यात एक मज्जाच असते. मग अवतरतो भाग दोन म्हणजे की ह्या नात्यातली ती बायको नावाची स्त्री अर्थातच नात्यातील एक बंध सोडून तुमच्या कडे आली असते. मग संसार म्हटलं की मग सुरु होतो तो एक असा प्रवास की भांडण झाले की समजूत काढायची जबाबदारी त्याचीच असते. हळूहळू मुलांच्या येण्याने एक वेगळाच आनंद, प्रेम दोघांमध्ये असतं. मुलांचे संगोपन करण्यात, घर, नोकरी सांभाळण्यात ती खूप थकून जाते पण तिचे कष्ट बघून त्याने प्रेमाने मिठी मारली की ती सगळं विसरून जाते. आई म्हणून संस्कार, मुलांची देखरेख ती करत असेल तरी त्यांच्या भविष्याची काळजी त्याला असतेच. त्यासाठी कुठे गुंतवणूक करावी, घरखर्च, बायको मुलांची हौसमौज करत तो सगळा गाडा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असतो. दोघांनी एकमेकांना ‌समजून घेणं, प्रेम, विश्वास जपणं तितकंच महत्त्वाचं असतं. खुप गोड असं हे दोघांचं नातं असतं. या सगळ्यात दोघांचं नातं घट्ट होत जातं, प्रेम वाढतच असतं. दोघांनीही एकमेकांची खुप सवय झाली असते. दोघांचे एक सुंदर नाते निर्माण झालेले असते. त्याच्याशिवाय ती आणि तिच्याशिवाय तो अपूर्णच असतात. दोघांनीही समजून घेवुन विश्र्वासानं हे नाजूक जन्मभराचं नातं जपण्याची गरज असते. जसजसे वय वाढत जाते, मुले मोठी होतात तसतशी एकमेकांची जास्त गरज भासू लागते. संसाराचा गाडा सुरळीत चालवायला खरंच दोघांचीही गरज असते.
जाता जाता एवढंच की आठवून बघा.. अनेक लग्नसमारंभांना गेला असाल ना तुम्ही दोघे. मित्रांच्या कोंडाळ्यात बसून पहिले असेल तुम्ही तिला रुखवताकडे पाहताना. कशी वेगळीच दिसत होती हो ती. किती प्रेमाने सांगत होती सगळ्यांना तुम्ही भेट दिलेल्या त्या साडीबद्दल. साधी मोत्याची माळ तर घातली होती तिने पण सगळ्या गर्दीत आज कशी उठून दिसत होती. श्रावणातल्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेत तुमच्या बाजूला बसून पदर डोक्यावर घेऊन तुळशीची ची पाने वाहताना तुमच्या हाताला केलेला स्पर्श आठवतो का...झर्र्कन एक वीज स्पर्शून गेल्यासारखा. गाडीच्या प्रवासात न विसरता थर्मासमध्ये भरून घेतलेला तुमच्या आवडीचा मसालेदार चहा तुम्हाला भरून देताना किती कौतुकाने पाहत हॊतात हो तुम्ही तिच्याकडे. तुमची पहिली स्कुटर घेतली तेव्हा मागे बसून थोडीशी तुमच्यावर रेलून, तुमच्या उजव्या खांद्यावर हळुवार हात ठेऊन तुम्ही स्कुटर चालवताना छान दिसता हे सांगणारी हीच तर होती ... काही पाने या गुलाबी आठवणींने माझ्या माध्यमातून तुमच्या पर्यंत मला पोहचवता आल्या हे भाग्य...
एक कविता वाचायला मिळाली त्यातले १-२ कडवे लिहतो न समारोप करतो...
:- नवराही खरंच खपतो
करून मेहनत नोकरी धंदा
पण घरचं व्यवस्थापन
नसेल तर होतो मोठा वांदा
करा कल्पना बायकोशिवाय सहल आणि सणावारांची
म्हणून वाटतं,
संसारात ७५% भागिदारी बायकोची...

नवरा काय करतो,
ते बायकोने दाखवलय करून
नवऱ्यानेही द्यावं आता आपलं कसब दाखवून
चार चाकाच्या गाडीचीही, फिरतात दोन मागची
म्हणून वाटतं,
संसारात ७५% भागिदारी बायकोची...

स्त्री-पुरूष समानतेच्या
राहिल्यात नुसत्याच गप्पा
बायको जरा काही बोलली
तर नवरा होतो खप्पा
बायको या संस्थेने गाठलीय
सगळीकडे नवीन उंची
म्हणून वाटतं,
संसारात ७५% भागिदारी बायकोची !

लेख खूप मोठा झाला अजून लिहिण्यासारख खूप काही आहे पण आता एवढ्यावर समारोप करतो. धन्यवाद !!

Friday, 29 May 2020

सुप्त गुणांना वाव द्या !

शिर्षक : अपेक्षाच ओझं नको सुप्त गुण शोधा...!

लेखन : एन.के. - ( पत्रकार )

         ....( संदर्भीय वरील शीर्षक नुसार आजच्या स्पर्धेच्या युगात आपण अनेक अशी घटना तपासतो की अमुक विषयात नापास झाल्याने किंवा एखादे ध्येय साध्य झाले नाही की जीवनयात्रा संपवून घेणारे असे अनेक विद्यार्थी, किंवा मानवी जीवनातील उदाहरणे आहेत. प्रत्येक जन्म दिलेल्या मध्यम पासून उच्च शिक्षित कुटुंबातील पालकांमध्ये आपल्या पाल्य कडून एक उच्चभु अशा पदभूषित नोकरीची किंवा पदाची अपेक्षा असते. आजच्या युगातील अनेक जणांनी ज्या अर्थी आपल्या मुलामुलीकडून अशा अपेक्षा ठेवणाऱ्या किंवा समाजात नाव व्हावं म्हणून विद्यार्थ्यांकडे एक लाक्षणिक अभ्यास माध्यमातून ध्येय पाहणाऱ्यांनी किंवा शाळेत शिकणाऱ्या, कोर्स करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या अशा सर्वजण आणि पालक-पाल्य यांनी वाचवा असा एक माझ्या लेखनातील लेख. )
   
              आपल्या कुटुंबात कुणी नवा सदस्य आला की कोणत्याही पालकाचे किंवा त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य नुसार प्रत्येक जण त्याला हे करावं तर त्याला ते करावं असं बातचीत सुरू असते इतकंच नाही तर त्या विचारला स्पर्श करून त्याला तसे अभ्यास पासून ते तसे संस्कार धडे द्यायला सुरू करतात यात आई म्हणत असते की मुलगा माझा हे व्हावं, बाप म्हणत असतो की अधिकारी व्हावं तर आजोबा म्हणत असतात की त्याने सैन्यात भरती व्हावे असे अनेक प्रश्न आणि अपेक्षाच भडीमार त्या शिकणाऱ्या पाल्याच्या डोईवर असते. ह्या मुलांच्या बाबतीत नाही तर आजच्या जगण्याकडे एक नजर केलं ना की असे अनेक जण म्हणजे लाखो करोडो कुटुंब अशा एका विशिष्टअपेक्षांच्या ओझ्याखाली धावत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती असो किंवा नोकरदार असो किंवा घर चालवणाऱ्या त्या गृहिणी सुद्धा अनेक प्रकारची टास्क घेऊन त्या पूर्णत्वास नेण्यासाठी कसरत म्हणजे एक प्रकारची खांद्यावर बंदूक म्हणतात ना तसे सेम अपेक्षांचं गाठोडं घेऊन जीवन जगत आहेत. सहज विचार केला की आपल्याला समजून येत की आपण ज्या प्रवाहात जगत आहोत त्या प्रवाहात आपण सध्या काय आहोत आणि आपली पायरी कोणती आहे, आपल्याला शिखर गाठायचं असेल तर आपल्याला कितपत पाय पसरावे लागेल आणि त्यासाठी आपल्याकडे अंथरून उपलब्ध आहे का , आपल्याला जे साध्य करायचे आहे ते करण्यासाठी आपण त्यासाठी सक्षम आहोत का, आणि जे व्हायचं आहे ज्या स्टेप वर आपण विराजमान होणार आहोत त्यासाठी आपलं मन, वातावरण, स्फूर्ती किंवा अनभिज्ञ असणारी सकारात्मक ऊर्जा आपल्यात तयार होईल का किंवा होणार का ? याची आकलनात्मक एक विचारांची किनार समजली जाणारी एक थिंक नावाचा पॉझिटिव्ह पिन आपल्या बुद्धीला किंवा मेंदूला व्हायला हवं हे खरं. म्हणजेच मला म्हणायचं इतकंच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही स्वार्थी नावाचा व्हायरस चिकटून असतो आणि त्या व्हायरसच्या माध्यमातून आपली वाटचाल असते तर त्या वाटचालीत आपल्याला अमुक न तमुक नावाच्या हेवा असतात न ते तस झालं की मला बर वाटेल, शेजारी हे आणले मला आणायला हवं, मला एवढं श्रीमंत व्हायचं आहे मला असं तस करावं लागेल,मला प्रमोशन हवं आहे मला हे करावं लागेल, मला असं हवं तसं हवं हे ठरवणे नक्कीच चुकीचं नाही, ध्येयवादी माणसाने नक्की असावे पण समाधान नावाच्या झाडाखाली झोप हवी असेल ना आकलन नावाच्या उशीला जन्म द्यावा लागेल मग ह्या आकलन म्हणजे हेच की आपण काय करू शकतो, आपल्यात कोणती धमक आहे हे ओळखून त्या वाटेवर वाटचाल करणे अर्थात असे की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे आपण क्रीडा क्षेत्रात आपलं करिअर आजमावत असू तर नक्कीच ठेच लागणार असे बारीक गोष्टी असतात समजा स्वतःला, पारखा मग ध्येय ठेवून चालायला सुरू करा वेळ लागेल पण तुमची वेळ येणार हे नक्की.
           काही अशी उदाहरणे आहेत आज आपल्या समोर की सचिन तेंडुलकर ज्याला ४ थीत असताना समजलं की मला क्रिकेट मध्ये रस आहे आज नामवंत जगविख्यात खेळाडूच्या यादीत नाव आहे. ज्याला इंग्लिश विषयात नापास व्हावं लागलं त्याच्या नावाने आज भारतरत्न अधोरेखित झालं. सांगायचं एवढंच की आपल्याला काय हवं या पेक्षा आपल्या जवळ काय आहे किंवा आपल्यात काय आहे हे ओळखून जगणे अर्थातच सुप्त गुणांना वाव देऊन जगणं होय. अस ही एक उदाहरण आठवत की आजही जपान मध्ये वयाच्या ४ थ्या वर्षी प्रत्येक बालकाचे आकलन केले जाते आणि त्याच्या आकलन क्षमते वरून अस ठरवलं जात की त्याला काय व्हायचं आहे किंवा हा कशात आपलं करिअर करू शकतो मग तिथूनच त्यांच्या जीवनाची वाटचाल पालक त्या दिशेने करतात म्हणूज आज ही जपान ऑलम्पिक मध्ये पोते भरून पदके मिळवतो तर आपल्या भारताच्या १३० कोटी हुन जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशाला एखादं पदकवर समाधान मानावे लागते.
              जगायचं सर्वांना आहे जाता जाता एवढंच सांगेन की प्रत्येक नात हे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपण जपत असतो या मागे त्याचा उपकार किंवा सुप्त गुण किंवा बहुदा त्याच्यात असलेली ती खुबी जी इतरांत नसते. म्हणून त्या नात्यांना तसेच जर अविरत आपल्या जीवनाशी बांधील ठेवायचं असेल तर तिथं ही त्याकडुन अपेक्षा बंद करून नात्याची खातरजमा करून त्या नात्याला तसेच पुढ्यात न्या, पालक आणि पाल्य हे वाचावं यासाठी सुरवातीला म्हटलं की आज मुलांना तुम्हाला काय हवं हेच डोळ्यासमोर ठेऊन ते जगत आहेत, पुस्तकं, खेळ, अगदी सिस्त बद्ध पणे वागतात पण कधी त्यांच्या मनाचा विचार करा, त्याला काय व्हायचं याकडे लक्ष द्या, तुम्हाला त्याला त्या क्षेत्रात त्याला नाव करताना पाहायला मिळेल न नाहक अपयश पाहण्यापासून तुमचे डोळे तरी वाचतील. लेख जास्त आणि मोठा झाला तरी काही विषय घेऊन आज पर्यंत लिहले प्रतिसाद बद्दल धन्यवाद वरील लिंक वर माझे अनेक विषय वर लेखन आहे जरूर भेट द्या.


धन्यवाद !

मोबाईल : 8806605862

Friday, 22 May 2020

कोरोना : माझा देश आणि बळीराजा...!

शिर्षक : कोरोना : माझं देश अन जगाचा पोशिंदा.... !!

लेखन : पत्रकार एन.के.
मोबाईल : 8806605852 

     
            
       खूप दिवस झालं माझ्या गावाला डोळे भरून पाहू शकलो नाही. कोरोनाच्या जागतिक महामारीने थैमान घातले या थैमान मध्ये अनेकांच्या चुली अगदी साजेस्या पेटल्या ना कुठला उठावेव ना कोणत्या जास्तीच्या गरजा किंवा ना कोणत्या मिजास खूप काही शिकवून गेला हा लॉकडाऊन किंवा हा आपला कोरोना. गरिबांच्या गरजेला सरकार धावून आले जीवाच्या आकांताने संरक्षण ही समर्पक मिळालं. पुणा मुंबईच्या लोकांनी गावाकडे आले आपल्या जिवाच्या खबरदारीने गावात आल्यावर ही स्थानिक लोकांत एक सौम्य भीतीचं वातावरण ही जागृत झालं पण गावाच्या हित संबंधात कायम अग्रेसर असणाऱ्या लोकांनी आणि प्रशासनाने नियोजन बद्ध कार्यप्रनाली राबवत समाजात आणि गाव ते तालुकात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून कंबर कसली. शासन आणि केंद्राच्या सगळ्या बाजूने देशाची आर्थिक घडी बसली पाहिजे यासाठी सगळे पुढे सरसावले. सुरळीत चाललेल्या गावाच्या गाव गाड्यातील बारा बलुतेदार यांच्या पारंपरिक आणि पूर्वजात व्यवसाय वर संक्रात आली. कोरानाच्या सावटातच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने तर काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीचीनांगरनी, वखरनी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे कोरोनानं जगभरातील प्रत्येकाला जेरीस आणलंय. व्यापारी घरात आहे, शिक्षक घरात आहे, उद्योजक आणि कामगारही घरात आहेत. कोरोनानं अख्खंच्या अख्खं जग घरात कोंडून ठेवलंय जणू...  पण, पण आपला शेतकरी मात्र राना-वावरात राबतोय. माती उपसतोय... घाम पेरतोय... अन् मोती पिकवतोय. मात्र ही पिकवलेला माती रानातच सडतेय. कारण कोरोनानं बाजारपेठांना कुलूप लावलंय..! 
            जगातल्या पहिल्या व्यक्तीपासून ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाची मुलभूत गरज अन्न हीच आहे. आणि अन्न हे केवळ आणि केवळ शेतीच देऊ शकते. म्हणून शेती टिकली पाहिजे. आणि त्यासाठी शेतकरी जगला पाहिजे. कारण, कोरोनाविरोधात सध्या सुरू असलेल्या या महायुद्धात डॉक्टर दवाखान्यात. पोलिस आणि पत्रकार रस्त्यावर लढतायत. या सगळ्यांचं पोट भरणारा शेतकरी या सर्वांइतकाच महत्त्वाचा सैनिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसमोर उभं राहिलेलं हे चक्रव्युह भेदून, धन-धान्य देणाऱ्या अन्नदात्याला आधार द्यायला हवा. त्याच्या खांद्यांना बळ द्यायला हवं. इतकं असताना सर्वांगीण समदं देशाच्या हितासाठी नव्हे तर जगाच्या उभारणीसाठी आपल्याला सर्वाना प्रशासन सोबत काम करून देशावरील हे संकट दूर करून पुन्हा "अपने दिन" परत आणायचे आहेत. 
         आताचे हे महत्वाचे दिवस म्हणून लेखन करतोय की आता या टप्प्यात कोरोना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे आज रोज रास पणे ग्रामीण भाग पासून ते समदं देशात कहर करणारा हा महा भयानक व्हायरस हळू हळू सगळीकडे पाय रोवू पाहतोय. १३० कोटी जनता आणि त्यातली ६० ते ७०% जनता गावात राहते. शहरातील मजूर स्थलांतरित होऊन तपासणी न करता गेले घुसले, शहरापर्यंत मर्यादित होत पण गावात कंट्रोल करणे खूप जोखमीचे होईल. यामुळे गावातील जे लोक आहेत त्या सुरक्षित भाग कोरोनाच्या छायेत जाण्याची दाट भीती आता जाणवू लागली. आज देश बाहेरच्या शत्रूशी कमी आणि अंतर्गत असणाऱ्या शत्रूच्या कारावाह्याशी लढतोय हे नक्की. गरिबी आणि अशिक्षिततेने पिचलेली जनताच आज भारताच्या पृष्ठभागावर दिसते आहे. मोदी जितका देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी धडपडत आहेत तितकंच ती प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. जाता जाता एवढंच सांगेन की गावागावात पोहोचलेल्या कोरोनाच्या पायदळी आपण भरडले जावू न त्यातून कधीच सावरणार नाही ही कल्पनाच न केलेली बरी तर काहींना वाटतंय चीन, इटलीने सावरलं स्वतःला. पण प्रत्येक चुकीचा आणि संकुचित पाऊल आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पायदळी तुडवणूक अर्थात देशाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाची नासाडी हेच कटू आणि अंतिम सत्य.!


धन्यवाद...! 

Monday, 4 May 2020

बार बार समझो... !!😢

जब तक नही समझोगे, समझाने वाला आता रहेगा..!

लेखन - एन. के. ( पत्रकार )

          नमस्कार ! नवीन विषय घेऊन तुमच्या पर्यत पोहचत आहे. गेले २-३ महिने झाले कोरोना हा शब्द अक्षरशः कानात पिंजून गेलाय, काम बंद, जेवणाच्या किंवा अत्यावश्यक वस्तूच्या मागावर असलेली मन रस्ते आज व्याकुळ झालेले आहेत. मध्यम वार्गीययांच्या कुटुंबाला उदर निर्वाह करणे जोखमीचे किंवा परंतु आव्हानात्मक झाल आहे. घरात बसावं तर अनेक कारणं असतात मग उकाडा अन्य अन्य ; बाहेर पडावे तर कोरोना सांगितलं जातं पण हे सर्वस्वी आपल्याला जड जात ते म्हणजे किंवा रुचत नाही असे म्हणजे बाहेर पडू का देत नाहीत. रोगाचे संक्रमण किंवा त्यावर असलेले बांधील सूचना पाळणे म्हणजे एखाद्या दुसऱ्याच्या जीवनासाठी नक्की नाही तर हे सर्वस्वी आपल्या चांगल्या जीवनासाठी. आपण नको ते प्रश्न चिन्ह उभं केलं आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून फरक न पडणाऱ्या न्यूनगंड मध्ये जगत राहिलो आणि बाहेर पडलो आणि त्याचा परिणाम म्हणून सांगतो आपण बेफिकीर , बेजबाबदारपणे वागलाे ६४७ वरून ३०००० पर्यंत भारताला नेणारे आपणही तितकेच जबाबदार आहाेत ना मग आपण आजही बघतो प्रशासन ज्या पद्धतीने लढा देतंय त्यात आपण यशाच्या जवळ आहोत आणि बाकीच्या देशांना ही आपला हेवा वाटतो आणि कुनीतीने त्यांना भारताविषयी द्वेश आहे पण आपण तरी कुठे देशाची पर्वा केली? लॉकडाऊनचं गांभीर्य लक्षात न घेता वागलाे.... पाेलिस , डॉक्टर्स , इतर सर्विस देणारी लाेक आपल्यामुळे मृत्युमुखी पडली तर काहीवेळा अस दिसून ही आलं की फक्त माेदी द्वेश आणि टीका ह्यातच धन्यता मानली, सहकार्य करण्याची सकारात्मक आपल्यात कसलीच तमा नाही. अशी बेशिस्त जनता असल्यावर बाहेरचे शत्रू हवेच कशाला ? आपणच आपल्या पुरतं घाणेरड्या विचारांती देश संपवायला पुरेसा आहे.
मित्रानो आज पण आपण सुरक्षित आहोत ह्यासाठी खरं तर आपण आपल्या सरकारचे (केंद्र असू दे की राज्य ) , डॉक्टरांचे , नर्सेस, शासकीय कर्मचारी आणि सगळ्यात महत्वाचे आपले पोलीस ह्यांचे शतशः आभार मानलेच पाहिजेत. आज ते आहेत म्हणून आपण आहोत. मोदीजींनी देशाला दिलेली 'लॉक डाऊन'ची हाक ही त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी नव्हती की ती राजकीय खेळी नव्हती. "लॉक डाऊन" हा फक्त आणि फक्त आपल्या आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी होता हे आज जगात जे काही मृत्यूचं तांडव करोनामुळे सुरु आहे ते बघून जाणवतंय. आपण जर तो पाळला नसता तर देशाची काय अवस्था झाली असती ह्याची साधी कल्पनाही न केलेली बरी... जवळ जवळ १,३५,००० मृत्यू ह्या करोनामुळे झाले आहेत. जगातील बलाढ्य देशांचे राष्ट्राध्यक्ष डोळ्यात पाणी आणून देवाकडे प्रार्थना करत आहेत की ह्या महामारीच्या विळख्यातून त्यांचा देश सुटावा. म्हणून प्रत्येकाला जाता जाता हेच मागण आणि हात जोडून विनंती आहे की घरीच थांबा आणि सरकारच्या सूचनांचे पालन करा यशाचं पारितोषिक लांब नाही.

धन्यवाद !

Monday, 20 April 2020

देवा दि देव बाप ..!

शिर्षक - माहीत नसलेला डोंगराएवढा आपला बाप...!!

घराला घरपण देणारी माणसं म्हणून आई वडिलांकडे आजकाल पाहिल जातं. समाजाच्या कानाकोपऱ्यात आईला महत्व आणि यशाचं कल्पिक श्रेय कायम देण्यात आलं. घर, खर्च, नाती, अडचणी सोडवणारा बाप माणूस कायम मागच्या रांगेत दिसला. बापाने माणुसकीची झाडं उभी केली, स्वतः कष्टाच्या हिंदोळ्यात गुंतवून घेऊन स्वतःची प्रतिमा झाकोळून जगाला आपल्या आप्तेष्ट असणाऱ्या कुटुंबाची झंकारच कायम प्रकाशझोतात तेवत ठेवली. आईच्या सोबतीची आणि मायाळू ऊब कायम सर्वांना समजली पण बापच महत्व आणि बापाबद्दल संदर्भ लेखन आणि उपमा कायम कमी प्रमाणातच आढळली. म्हणतात ना की जिजाबाईंनी शिवाजी महाराजच्या रुपात दैवत ए महाराष्ट्र नक्की घडवला किंवा तसं अवश्य म्हणाव,पण त्याचवेळेस शहाजीराजांची ओढताण सुद्धा लक्षात घ्यावी. शहाजी राजे आपल्या नेतृत्व आणि संभाषण कौशल्य अधिक निधड्या छातीने स्वराज्यासाठी रावण रंक व्यक्तिमत्व निर्माण करून शत्रूला अस्मान दाखवण्याची पुरुषार्थ कला मात्र महाराजांच्या देवाने अर्थात बापानेच दिली अस हे सत्य न स्वीकारावेच सोबत देवकीचं,यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून कृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव पण तितकाच लक्षात ठेवावे. आजच्या आपल्या आधुनिक जगाच्या गाभाऱ्यात वडिलांच्या टाचा झिझ्लेल्या चपलांकडे, पडलेल्या बनियनच्या भोकातून आपल्या बापाची कीर्ती न स्वराज्य नकाशा इतका प्रखर आपला बाप असतो. घरासाठी १-१ रुपयांची कधी न कधी काटकसर केलेला अधोरेखित बाप हा पुण्य दैवत ए होम असतो, दैवत ए जिंदगी असतो, दैवत ए सुख असतो हे विधिलिखित सत्य.
वडिलांचं महत्व कोणाला कळत? १०० दा बापाच्या प्रशशेंची स्तुतीसुमने गायली तरी कमीच बापाबद्दल लिहायला खूप काही आहे शब्द अपुरे पडतील इतकं बापच व्यक्ती मत्व आहे. अनेक ठिकाणी पितृछत्र हरपलं की घर सांभाळून घराची सावली बनुन राहणारी अनेक मोठी मुले, भावंड, आई, यांची जबाबदारी घेणारी माऊली- मुली असे अनेक जणांना बापाच्या व्यक्तिमत्व बद्दल नक्कीच जास्त माहिती असणार आहे. आईला न घराला बघत बघत स्वतःची इमेज तयार करायला लागणार वेळ आणि त्यानंतर पाठीमागे पाहिलं तर बाबा, पप्पा, वडील यांचं कर्तृत्व आठवलं तर नक्कीच डोळ्यांत अश्रू तरळल्या शिवाय राहणार नाहीत. लग्न सराई त्यात मुलीचं आयुष्य बहराव, मुलगा हवं नको बघितला असेल नसेल पण बापाला एक कप चहा, आणि एक ग्लास पाणी देणारी आपली मुलगी बहीण ताई हिच्या लग्नाच्या वेळी डोंगराच्या आकारएव्हढं बापाचा अंतकरण भरून येत. बापाच्या पश्चात पितृ छत्र नसलेल्या कुटुंबाला एकेक वस्तू, सुख क्षणासाठी , वस्तूसाठी तरसावं लागतं. अस हा बाप, बाबा, फादर, वडील ज्याची ख्याती जगविख्यात आणि डोंगराच्या अथांग विशालतेत पण न मावणारा लक्षणीय आपला बाप.



लेखन : एन.के. - ८८०६६०५८५२

महाराष्ट्र पोलीस दैवत ए जंग !

शिर्षक : "वर्दीवाल्या तूच आता आमच्यासाठी सर्वस्व रे" !!

ओस पडली मंदिरे आणि देऊळ तारणारं कोण दिसेना,
जिवाच्या आकांताने सगळेच भयभीत कसला हा करोना,
एक विषाणू सांगतोय जगाला तुम्ही शून्य आहात,
माणुसकी विसरून जाताय त्याचीच फळे भोगत आहात...!!१!!

शेवटी फक्त उरणार प्राणी आणि पक्षी न मोकळं रान,
मानवा बघितलं नाहीस माझं रूप आता कर गुमान सहन,
जग ओस पडेल सगळे अन्न धान्याला महाग होतील,
डोक्याला हात लावून सगळं बघून रडशील ; आताच रडून घे रे !!२!!

वर्दीवाल्या तूच आता आमच्यासाठी सर्वस्व रे...- २

बोललं सरकार फिरू नको उनाडगत जीवाशी जाशील मरून,
मानव ऐकला नाही अन फिरत राहिला मोकळं गाव न रान,
पोशिंदा म्हणून उभं झाले ते देव वर्दीतले त्याचं थोडं ऐक,
मानव जन्म पुन्हा नाही मिळणार करून घे आताच काम नेक,

देव पण आला नाही वाचवायला आणि येणार ही नाही तुझ्या मदतीला,
पोलीस येतील न समजावून सांगतील जीवन म्हणजे काय स्मरून घे त्या गोष्टीला,
मेल्यावर कोण नाही उचलायला अशी गत हा विषाणू करेल,
आयुष्यात येऊन खूप मिळवलं तू पण जाताना साधं स्पर्श पण नशीब नसेल तुला अरे,

वर्दीवाल्या तूच आता आमच्यासाठी सर्वस्व रे...- २

अहोरात्र झटून तुमच्यासाठी जीव ही मुठीत घेऊन हिंडतात हे देव,
मार खाऊन ही ढुंगण सुजल तरी ओसाड हिंडायची सुटते कशी तुला पेव,
जगायचं असेल तर माय-बाप माणसाचं ऐकून घे थोडंस,
नियम मोडशील बसेल काठी पण अंती संपवून घेशील जीवन हे गोंडस,

तुला तमा नाही या जगात नाही तुझा हेवा कुणाला या मातीत,
दाखवून दिलं ह्या निसर्गानं तू आहेस काडीचा ह्या भु -भागात,
त्यांना पण संसार आणि घर आहे पण राबतात देवदूत तुमच्यासाठी,
विठ्ठल आणि अल्लाह नाही इथं पण कायम वर्दीवाले हे प्रभू असतात जगासाठी !!३!!

वर्दीवाल्या तूच आता आमच्यासाठी सर्वस्व रे...
वर्दीवाल्या तूच आता आमच्यासाठी सर्वस्व रे...

जाता जाता एवढंच सांगतो जगात असं मानव नाही जिथं देव आणि श्रद्धा नाही,
पर आज तीही झुकली पण सामान्य आणि देशासाठी ह्यांची ड्युटी कधीच माग हटली नाही,
संसार आणि मुलं बाळ असतात त्यांनाही जगायचं त्यांना पण,
तू उनाडगत फिरू नको बाहेर काढ आता तरी त्यांच्या साठी तुझ्यातला तो माणूसपण...!! ४!!


लेखन :- एन.के. ( पत्रकार / समाजसेवक )
मो. - ८८०६६०५८५२

भाकरी मिळेल ना ?

शिर्षक :- साहेब ! "आमच्या भाकरीची तजवीज पण होऊद्या ओ..!"

कोरोनाच्या महामारी संकट मूळ सगळ्याच्या जीवन मरणाचा गाडा आता कुठं न कुठं दिवसेंदिवस स्लोडाऊन झालाय हे नक्की ह्या लॉकडाऊन मुळं प्रशासन आणि सरकारच्या मध्यात जनता पण त्रस्त झाली असेल कदाचीत विचाराने पण त्या भाजीपाला न अर्धी भाकरीपायी कधी न बाजार पाहिलेला माणूस नव्याने गावात आलेल्या माकडागत माणसाची अवस्था होतेय हे नक्की. जागतिक संकट म्हणून नावारूपाला आलेल्या कोरोनाच्या शिकवणीला एक धडा म्हणून जगणं आणि पैसे हेच सर्वस्व नसत आणि श्राधिक भावनेने तयार झालेले देव, धर्म आज निपचीत पडून आहेत हे ही नक्की माणसाला समजलं. सगळ्यात जास्त यात कुणाला त्रास झाल असेल तर स्थलांतरित होऊन आलेल्या कुटुंब किंवा देवाच्या श्रद्धेला साक्षी ठेऊन मागून खाणाऱ्या किंवा फिरत्या व्यावसायिक , गिसाडी यासारख्या कुटुंबाची फरफड मात्र झाली हे नक्की. चार पैक मिळतील या आशेने आलेल्या ह्या कुटुंबाने आपला संसार उघड्या अभाळखाली मांडला खरं पण कोरोनाने त्यांच्यावर काळाचा घाला घातला पोटच्या भाकरीचा तुकडा सुद्धा हिरावून घेतल या कोरोनाने. जगाच्या बाजारात आज प्रत्येक माणूस ४ बुक शिकून स्वतःच्या जीवाला जपायचं म्हणून तोंडाला मास्क आणि काळजी घेताना दिसतोय. 
पण असे कुटुंब, वेडसर होऊन फिरणाऱ्या काही पर्मनंट पाहुणे यांच्या आरोग्याची काळजी आणि पोटाची खळगी याकडे लक्ष कुणाचं गेलं नाही. 
मंत्री न संत्री सगळीजण जनतेच्या विचारानं योजना, धान्य, गॅस , सेवा सुविधा देताहेत. कोरोना पासून जनता वाचली पाहिजे म्हणून प्रशासन आणि सरकार तारेवरची कसरत करत आहे. पण यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीच नाही. भारत म्हणजे धार्मिक आणि संस्कृतीच्या स्वबळावर स्वार होऊन जीवन जगणाऱ्या देशातला एक देश. पण आज प्रार्थना करायला जाणार मंदिरे पण नाहीत इतकी भयावह परिस्थिती ओढवली आहे. माणुसकी पणाची एक मशाल म्हणून रक्कम शासनाला जमा होतेय पण ह्या गाव गाड्यात राहणाऱ्या व्यावसायिक कुटुंबांना पण आधार हवं. कोरोना मुळ कंपन्या बंद झाल्या खायचं काय म्हणून हतबल झालेल्या लाखो तरुणांनी गावाकडे जायला धूम ठोकली पण अडकले मध्यात. शासन सगळं करतय पण आपल्या देशात आरोपी सारख राहायला लागली ही माणसं. प्रशासन आणि सरकार दिलेलं निर्देश देशाच्या आणि आपल्या जीवासाठी महत्वाच्या आहेत न ते पाळले पाहिजे हे नक्की. पण आज दैवत म्हणून अवरतलेले रस्त्यावरचे देव आणि दवाखान्यात असलेले डॉक्टर यांना ही तात्पुरती जनता आज एवढंच म्हणत असेल की , साहेब ! "आमच्या भाकरीची तजवीज पण होऊद्या ओ..! 
साहेब ! "आमच्या भाकरीची तजवीज पण होऊद्या ओ...!


लेखन : पत्रकार एन.के. ( मो. 8806605852)

Think !!

शिर्षक :- विचार : सकारात्मक आणि नकारात्मक..!

अनेकदा जीवनाच्या पावलावर एखाद्या सत्य किंवा कल्पक गोष्टींच्या बाबतीत आपल्या डोक्यात चालू असलेले तर्क वितर्क अर्थातच विचार. विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे आहे किंवा असते हे अनेकदा आढळून आले आहे. निसर्गाने हा विचार करण्याचा एक चातुर्य किंवा विचारशक्ती माणसाला अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. विचाराने निर्णय आणि विचाराने दिनचर्या किंवा कोणतीही गोष्ट घ्या त्याबाबत अधिकचे जाणून घेण्याच्या चौकस बुद्धीने अनेक कार्य फळाला गेलेली आज समाजात उदाहरण आहेत. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे साठ हजार विचार करतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. थोडक्यात माणूस जरी काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल तरी त्यावेळी त्याच्या मनात विचार सुरूच असतात. अगदी सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचारच करत असतो. म्हणजे सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यत शरीराच्या हरेक अवयव पासून ते पेहराव पासून अगदी चप्पल विशिष्ट वेळेत घालण्याचा एक विचार सुद्धा मनात असतो. एखादे काम करत असतानादेखील बॅक ऑफ दी माईंड खोलवर कुठेतरी सतत विचार सुरू असतात. जर माणूस सतत विचारच करत असेल तर तो नेहमी आपल्या विचारांच्या संगतीमध्ये जगत असतो असे म्हणावे लागेल. शिवाय विचारांप्रमाणे माणसाचे जीवन घडत असेल तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आहे. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. मात्र विचारांबाबत सावध नसल्यामुळे आजकाल सगळीकडेच नकारात्मक विचारसरणी दिसून येते.
सत्य आहे ना की आज काल माणूस १०० - एक विचारात जास्तीत जास्त विचार आपल्या स्वतः बाबतीत कमी पण सकारात्मक आणि इतरांच्या बाबतीत जास्त पण नकारात्मक विचार करताना दिसून आले आहे. म्हणून जस सुंदर हवं आपल्याला सगळं स्वतःच तस चांगलं आणि तितकाच सकारात्मक विचार आपण करायला हवं हे ही सत्य.
मन आणि विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे अनेक माणसे कळत अथवा नकळत सतत नकारात्मक विचार करत असतात. काही जणांना नकारात्मक विचार करण्याची ऐवढी सवय असते की प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्या मनात आधी नकारात्मक विचारच पहिला येतो. शिवाय आपण कळत आणि नकळत सतत नकारात्मक विचार करत आहोत याची पुसटची जाणिवदेखील या लोकांना नसते. मात्र निसर्ग आपले काम अगदी प्रामाणिकपणे करीत असतो. चुकीच्या विचारांचे परिणाम माणसाला निसर्गनियमानुसार भोगावेच लागतात. यासाठी प्रत्येक माणसाला सकारात्मक विचार आणि मनाचे सामर्थ्य माहीत असायलाच हवे. सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकीक अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे.

लेखन :- पत्रकार एन.के.... ✍️

रिफ्रेश नेचर फॉर यु...!

शिर्षक : रिनिव्ह निसर्ग तुमची वाट पाहतोय...!

आपण राहतो तो देश म्हणजे भारत. भरताना वैचारिक आणि अभूतपूर्व शैलीचा इतिहास स्पर्शून जातो. विविध भाषा, प्रांत, विविध वेशभूषा, विविध खाद्यसंस्कृतीने विशाल नटलेला हा आपला देश. निसर्गाने देखील भूभाग आणि निसर्ग सौंदर्य ही भारताला मुबलक दिल आहे. मानव हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला खायला कमवाव लागत अर्थात बाकी सगळे जीव शृष्टीला आपली उपजीविका स्वतः करतात. भारतला असो किंवा जगातला कोणताही मनुष्य थोडी का होईना श्रद्धा, प्रेम न जिव्हाळा अर्पित करणारा किंवा मानणाऱ्या रांगेत येतो. कधी कधी आपल्या श्रद्धेच्या आणि कष्टाला बगल देत समाजाच्या एक विशिष्ट उंचीवर जाण्याच्या लोभापायी मानव माणुसकी नावाचं पुस्तक झाकून ठेऊन कृत्यात उतरताना दिसतो. आपल्या जगण्याकडे एकवेळ बॅक बघितलं ना की दिसून येत की, या विश्‍वाच्या अनंत पसार्‍यात इतर आवश्यक घटकांप्रमाणे मानवी जीविताच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वृक्ष, वनस्पती व प्राणी यांचाही मोलाचा वाटा आहे. यामुळे त्यांचं संवर्धन आणि जपणूक ही आपलं आद्य कर्तव्य आहे याचा विसर ही मानवाला पडला आहे ते ही १००% खरं. यासाठी आज आपल्याला कळून चुकलं असेल की परिस्थिती आली की चुका सुधारून ही काही होत नाही किंवा त्याला असणारी कल्पक बंधनकारक उपाय पण टेंगणे पडतात असा बदला निसर्ग एखादं दिवस हा निसर्ग घेणारच न हे त्याने दाखवून ही दिलय. सांगायचं उद्देश वजा संदेश एवढंच की आजच्या प्रगत वैज्ञानिक युगात मानवी समाजास निसर्गाच्या सान्निध्यात निर्दोष जीवन जगायचे असेल व इतरांना जगू द्यायचे असेल तर निसर्ग रक्षणाचे व पर्यावरण समतोलाचे मूलगामी कार्य माणसाला करावेच लागेल, त्याशिवाय आपण हे महत्कार्य पूर्णत्वास नेऊ शकणार नाही. मानवाने त्यांचा भाग काबीज करण्याचा प्रयत्न केला, आता ते तुमच्या भागात येवून थैमान घालतील, तर दोष कुणाचा ? सोसा मग !
संदर्भ दुसरा घेऊन येतो म्हणतात ना "सृष्टीची किमयाच सारी.. मारे तो शैतान, तारे सो भगवान" आधी निसर्गाची अधोगती करायची आणि नंतर निसर्ग कोपला की गोंधळ माजवायचा. आता आजच्या परिस्थितीच घ्या ना की विज्ञान, तंत्रज्ञान सगळं टेंगणे पडलंय पण संकट काही जाईना , आजच्या मानवाला आपल्या जीवाची पर्वा वाटू लागली इतकंच खरं पण कर्माच्या अधोगतीने आपण नरक जवळ करतोय हे कधीच उमगलं नाही. तस सेम माणूस कितीही विज्ञानवादी असला आणि मानवाला त्याच्या कुशल बुद्धीवर प्रचंड विश्वास असला तरी त्यालाही मर्यादा आहेत. जेव्हा त्या मर्यादेचे भान होते आणि तेव्हा माणूस निसर्गशक्तीला शरण जातो. ही तीच निसर्गशक्ती आहे जिला कोणी भगवंत मानतो, कुणी खुदा तर कुणी जिजस. प्रत्येकाच्या दैवी संकल्पना वेगळ्या असल्या तरी सामान्य भावना तीच आहे, ‘शरण आये हम तुम्हारे रक्षा करो भगवान’. याच भावनेतून ‘कोरोना’ विषाणूचे थैमान घालविण्यासाठी सर्व मतावलंबी आपापल्या इष्टदेवतेंच्या चरणी जात असल्याचे दिसून येत आहे.
सगळं ठीक आहे पण आता खरी परिस्थिती पाहता घरी थांबणं आणि स्वतःच आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे हेच एकमेव पर्याय आपल्या कडे असेल कर्म न मर्म पाहून देव न निसर्ग नक्की आपल्या पारड्यात आपला हिस्सा टाकेल पण त्या लेखा-जोखाला वेळ नाही, किंवा मानव जन्म पुन्हा नाही म्हणून ह्या संकटाला हरवायच असेल तर काळजी घ्या. संकट टाळलं गेलं की मग आहेच रोजच जनजीवन. निसर्ग आता आपली परीक्षा पाहतोय. आपण घरात न प्राणी सैसाल न खुश अशी एक रचयिता दृश्य आहे. सो काळजी घ्या आणि काळजी करू नका निसर्ग वेळ घेतोय स्वतःसाठी आणि तो परतेल नवं न ताज तवांन होऊन तुमच्या भेटीला उसंत असुद्या लवकरचं रिनिव्ह कल्चर भेटणार हे नक्की.


लेखन : पत्रकार एन.के. 

Sunday, 5 April 2020

आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकवेळी गुगल मॅप नसतो ..!

         

       सर्व साधारण जीवनाच्या जडणघडण मध्ये अनेक प्रकारची माणसं असतात. प्रत्येक माणसाच्या जीवनशैलीत प्रत्येकाची काही ना काही अडचण, दुखाच एक क्षणिक का होईना पण एखादी किनार असतेच. काही महिन्यापूर्वी एका ठिकाणी मित्रा समवेत एक कार्यक्रमात जाण्याचा योग आला. आमच्यात मनसोक्त गप्पा रंगल्या . सगळ्यांची वेगळी कहाणी . कुणाला या कॉलेजात त्या कॉलेजात अॅडमिशन मिळेल का ही चिंता , कुणी नोकरीत पगारवाढ झाली नाही म्हणून हिरमुसलेलं होतं . तर कुणाला या वर्षी तरी पोस्ट काढायची होती . कुणाला परदेशात एमएसला प्रवेश हवा होता आणि कुणाकुणाला विशिष्ट वयापर्यंत सेटल व्हायचं होतं . असे सगळ्यांचे प्लॅन तयार होते . सर्व एकमेकांसोबत शेअर करत होते . तेव्हा असंच आमच्या गप्पा मधून एक कटाक्ष टाकलं तर एक आजी - आजोबा यांचं जोडपं आम्हा मुलांच्या घोळक्याशेजारी बसले होते . आमच्या मोठ्या आवाजातल्या गप्पा त्या आजी - आजोबांना ऐकु जातच होत्या बहुतेक. काही वेळानंतर त्या आजोबांनी आमची चौकशी केली . कोण कुठलंय , कुठून आलोय , काय करतोय याची माहिती विचारली . आणि त्यानंतर हळच म्हणाले । " माझाही नातू तुमच्या वयाचा आहे . आता हट्टाने रशियाला डॉक्टर व्हायला गेला आहे . तुमच्या पिढीकडे पाहून वाटतं , 
          तुमच्याइतकं नियोजन आम्ही कधी केलं नाही . ते बरंही होतं . तेव्हा स्पर्धाही नव्हती . तुम्हाला तुमची ठिकाणं माहीत आहेत हे चांगलंच आहे . तरी लक्षात ठेवा , आयुष्याच्या प्रवासाला गुगल मॅप नसतो . " आम्ही थिजलो . विचारात पडलो . आजोबांचं हे वाक्य अनुभवाचं होतं . कारण स्थिर - अस्थिर असे दोन्ही तट आजोबांनी अनुभवले होते . त्यामुळेच पटणारं होतं. आयुष्याचा प्रवास सुरू होतो तो पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत . पण रोजच्या धावपळीत काहीतरी निमित्ताने प्रवास करतच असतो . गच्च भरलेल्या शहरात , खच्चन भरलेल्या बसच्या गर्दीत , सिग्नलवर वाट बघत , स्टेशनवर ताटकळत , लोंबकळत प्रवास हा चालच असतो . कधी स्वतःच्या वाहनाने ट्रॅफिकच्या गर्दीतही रेडिओ ऐकत स्टिअरिंग फिरवत , दुचाकीवर स्वार होत क्लच , ब्रेक ऍकसिलेटर आणि गिअर बदलत आपला प्रवास चालूच असतो अखंडपणे . मात्र भरलेल्या शहरात , गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यावर एक गुगल मॅप सतत आपल्या मदतीला असतो . अनोळखी ठिकाणी पोहोचवण्यासाठी . हा गुगल मॅप इच्छित स्थळ शोधून द्यायला आणि रस्ता दाखवायला तत्परच असतो . पण आयुष्याचं असं नाही ना ? अमुक एक ठिकाण आपल्यापासून किती दूर आहे हे वेळ आणि अंतर यासह गुगल मॅपला अचूकतेनं सांगता येत असलं तरी आपण पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी लागू शकणारा वेळ आयुष्याच्या प्रवासात कधी समजतो का ? अर्थात नाही . रस्त्यावरच्या प्रवासात ट्रॅफिक सिग्नलवर काही निश्चित सेकंद थांबून कूच करता येते . 
         
             
        अगदी सहज आणि निष्ठेने सांगायचं झाल तर आयुष्यात अनेक पर्वावर आपल्याला यश अपयश मिळत राहत पण कधी कधी आपल्याला हवं असत ते ध्येयवादी रस्ता मिळत नाही तर कधी कधी आपल्याला नको असलेल्या मॅप वर आपण येऊन ठेपतो. अर्थातच सगळ्याच गोष्टी आपल्याला गुगल वर मिळतात असे नाही. माणसाची तमा किंवा अपेक्षा विचारात घेतल्या तर ७०% गोष्टी ह्या माणसाच्या आचरण आणि वागणुकीच्या लेखा-जोखावर मिळतात, म्हणून का होईना साधं आणि सोप्प जीवन जगायला सुरू करा त्यामुळे आपल्याला हवं नको ते नक्की आयुष्यात मिळत राहील हे नक्की. आयुष्याच्या प्रवासात सहनशीलतेने खूप वेळ वाट बघायला लागू शकते . त्यासाठी लागणारी वेळ आणि अंतर कुणालाच ठाऊक नसतं . ही प्रतीक्षा न संपणारी असू शकते . पण हरकत काय ? एक दिवस बस नाही मिळाली आपण रिक्षा , टॅक्सी घेतो , तर कधी पर्यायी रस्ता निवडून इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करतो तसंच कायम प्राप्त परिस्थितीत पर्यायांच्या शोधात राहायचं . जरा विसावायचं आणि पुढे जायचं . . जरा नजर बदलली की प्रवास सुंदर होतो. 

लेखन : पत्रकार एन.के.- 8806605852

Friday, 3 April 2020

वरुणराजाची आनंद अश्रू...!

शिर्षक : अखेर पावसाच्या सरी रुपात वरुण राजा सुखावला...!
 
"मानवाने माणुसकी विसरली, प्राणी मात्रावर दया न प्रेम विसरला, गरिबांच्या खिल्लीला उगम दिला तर आपल्या श्रीमंतीला माज दिला म्हणून निसर्गाच्या प्रकोपात निर्माण झालेल्या जगावरच्या संकटावर आज सर्वस्व हतबल झालं याच संक्षिप्त उदा. आणि यात मानवाला शिकवलेला धडा आणि यावर उदार होऊन इंद्र देव हास्य करत सरी रुपात भूतलावर आलेल्या क्षणाची स्पस्टोक्ती करणारा लेखांकन स्पर्शत एक प्रयत्न..."
                   

     कोरोनाच्या महामारीने अक्षरशः थैमान घातले आहे. जे सुखाच्या दारात उभं राहून गर्वाने चालेलल ऐटीतलं जनजीवन पण विस्कळीत होऊन पडलेल्या मानवी जीवनाला आता या विषाणूने जेरीस आणून सोडले आहे. भूतलावर असलेल्या प्राणीमात्रावर निसर्गाने जन्मताच विभागणी वजा एक कल्पक ओळख दिली आहे. काही देशात या प्राणीमात्रावर जीवानिशी खेळून अन्याय केला त्या अन्यायाला निसर्गाने मानवाला चांगली अद्दल घडवली. माणसाला आपल्या घरचं हक्काचं दार पण आज बंद करायला लावल त्या विधात्याने. "जैसे ज्याचे कर्म फळ देतो ईश्वर" या पंक्तीप्रमाणे मानवाला फळ देतोय इतकंच सत्य. मानवाने मानवतेच्या शाळेत उत्तम राहणे किंवा राहायला हवे होते याची शिकवण देऊन जाणारी ही आजची भयावह परिस्थिती. मानव निर्मित मशनरीपण आता काम करत नाहीत, पैसा, अडका, धन, दौलत सगळी पाण्यात गेलीय हे नक्कीच सत्य. काळाच्या घाल्यासमोर मानवच काही चालेना हे तितकंच कटू सत्य. सांगायचं तात्पर्य इतकंच की मानव जसा वागला, राहिला त्याची फळे इथं वाटली जात आहेत हे नक्कीच खरं. सगळे देव, प्रार्थना सुद्धा हरून कोपऱ्यात पडलेले आहेत. इतकी दुर्दशा जिंदगीत झाली नाही स्पस्टोक्ती जेष्ठ लोक करत आहेत. यातून बचाव करायचं असेल पुन्हा नेटाने जगायचं असेल काळजी घेणे न समाजाच्या हितासाठी झटणे हा एकमेव मार्ग मानवसमोर आहे.
          अशावेळी कालच्या सायंकाळी निसर्गाने ढग काळे केले, तर पावसाच्या प्रमाणाचे वातावरण धारण करून घेतलं आणि काही अवकाळी पावसाचा सरी अचानक कोसळायला सुरवात झाली तो मुग्ध करणारा मातीचा सुगंध सांगत होता असेल की मानवा मी आता सुखावलो, तुझ्या कष्टाला उरलो, तुला पोसल पण मानववृत्ती तू नाहीशी करतोय पण आता तुझ्यातल्या मरणाच्या भीतीने तू राग, मोह, मत्सर काढून टाकून माणूस बनून राहिलास त्या क्षणांनी मी भारावलो अर्थात सुखावलो. निसर्गाच्यात आत असणाऱ्या जन्मजात बदला वृत्तीला तू पुरून उरणार नाही हेच सत्य. पावसाच्या सरी सांगत असतील की हे मानवा आता मी ही सुखावलो न इतकंच नाही पावसाच्या निमित्ताने आनंद अश्रू सुद्धा मी ढळल्या माणसाच्या असणाऱ्या मागण्या किंवा मी पणाचा काहीसा अंत मी कोरोनाच्या माध्यमाने तुजला योग्य ती शिक्षा दिलीय मी आता भोग आपल्या कर्जाची फळे. वरुण राजा कोसळताना म्हणत असेल आणि आनंद व्यक्त करत असेल की मी ही तृप्त झालो आमच्या निसर्गावर जेरीस म्हणून असलेल्या मानवाला पण अद्दल घडली म्हणून धारा कोसळवून वरुन राजा पण ढसा ढसा रडला आज. अवकाळी पावसाचा स्वरूपात प्रकट होऊन साक्षात ईश्वरच पृथ्वीर येऊन अवस्था बघून सुखावला असेल आणि त्यात नित्य समाजसेवा करणाऱ्या माणसाचं रूप न हाल बघून आज इंद्रदेव पण रडला असेच म्हणावे लागेल. जाता जाता इतकंच म्हणावं लागेल की. निसर्गाच्या सानिध्यात राहताना माणुसकी पणाच दर्शन घडवून समाजसेवेची प्रार्थना अर्पण केल्यासच हे सर्व काही बरे होईल अन्यथा बोध दिलेल्या या परिस्थितीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही हे ही सत्य...!


लेखन : पत्रकार एन.के. (8806605852)

Wednesday, 26 February 2020

ONLINE : OFFLINE !

डिजिटल किती सेफ, किती घोडेबाजार ?

           आपल्या ज्ञात गेल्या १०-१२ वर्षात संगणक युग अर्थात डिजिटल दुनियेची धून वाजत आहे. संगणक नाही तर कोणतेही काम नाही असे दृढ व्याख्या बनून गेली आहे. कोणत्याही क्षेत्रात आता ऑनलाईन शब्दाशिवाय कामच होत नाही. आज कामे राहतील बाजूला पण ऑनलाइन संभाषण म्हणजेच कनेक्शन असे समजणारी नवीन समाज तयार झालं आहे म्हंटलं तर वावग ठरणार नाही. आजकाल सकाळ झाली की मोबाईल हातात घेतल की पाहिल्यादा डेटा सुरू करून ऑनलाईन येऊन मेसेज पासून नवीन विषय हातात हाताळायची जणू हौसचं. अनेक वर्षे झाली पंतप्रधान यांनी डिजिटल नावाच्या शब्दाला आणल्यापासून प्रत्येक माणसाचे काम असो किंवा कोणतेही संदर्भ असो इंटरनेट शिवाय काम होत नाहीत. गेल्या काळात एखादे काम करावयाचे असेल तर १०० कागद लागायची , १७-६० पडताळणी व्हायच्या पण आता ऑनलाईन सिस्टीम मुळे वेळ तर वाचलेच पण धगधग पण कमी झाली. पण या युगात आपण या ऑनलाईन नामक प्रक्रिया किती सेफ किंवा किती यात घोडेबाजार होतो हे कळणे मात्र अशक्य. ऑनलाईन कामे झाल्याने सुखवस्तू म्हणून पाहणाऱ्या सर्वांना आपण केलेलं ऑनलाईन काम किंवा आपण आपल्या कामासाठी दिलेली दस्तऐवज किती सुरक्षित आहेत याची परिसीमा मात्र अस्पष्टच.
           ऑनलाईनच्या या गौडबंगाल खेळामुळे घरात संगणक असेल, इंटरनेट असेल तर कोणालाही ‘ऑनलाइन शॉपिंग’ची इच्छा ही होणारच! तसंही खरेदी ही कोणाची आवड, कोणासाठी अगदी व्यसन तर कोणासाठी ती डोकेदुखीचीही बाब असते. प्रसंगी आपण या खरेदी करण्याचा उद्देशाने बोगस साईट आपल्यासमोर लादल्या जातात आणि त्या नुसार आपण साईट आणि त्या मागणी नुसार आपली असणारी पर्सनल माहिती किंवा यात अकाउंट नंबर, आधार नंबर किंवा पॅन डिटेल्स आपण सेव्ह करतो पण पुढे आपल्याला जर वस्तू आवडली नाही तर आपण पर्यायी प्रोसेस रद्द करून सोडतो मग हे आपण भरलेली माहीती चोरली जाऊ शकत नाही का ? काही वेळा पैशाचे व्यवहार आपण करताना आपल्याला OTP येते आणि मग त्या नंतर व्यवहार पूर्ण होतो. पण काही वेळा नेटवर्क मूळे प्रलंबीत झालेले व्यवहार पुन्हा नवीन नेटवर्क मध्ये नको असलेले व्यवहार पूर्ण झालेले अनेक उदाहरणे आहेत.
ऑनलाईन आज सुरक्षित की अ-सुरक्षित हा प्रश्न सर्वांच्या समोर पडतो. किंवा त्यात किती ठिकाणी घोडेबाजार होतो हा ही तितकाच महत्वाचा प्रश्न सर्व सामान्य किंवा आपल्यासमोर पडलेलं आहे. उदा. एखाद्या ऑनलाईन सर्व्हे मध्ये जर विहित माहिती भरली तर आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळतो. पण ऑनलाईन सिस्टीम असल्याने काही माहिती अचूक भरली जाते व लाभार्थी म्हणून नसलेल्याला काही वेळा लाभ मिळतो आणि सामान्यांच्या वाटेला काही वेळा फक्त वाट पाहिल्याशिवाय काय पदरात पडत नाही.
        काही ठिकाणी ऑनलाईन ही उक्ती म्हणजे खरी डोकेदुखी बनते १० रु. च्या कामाला संगणक बघून आपल्याला १०० रु. द्यावे लागतात. कागदी घोडे नाचली तरी चालतील पण गरिबांच तोंड लहान झालं की १०-२० कमी करून अगोदर काम व्हायची. पण आता ऑनलाईन म्हणजे दवाखाना झालाय संगणक वर काय होतंय कळत नाही आणि सांगेल तेवढं पैसे देऊन औषध घेतल्यासारख आपल्याला पैसे द्यावे लागतात. आणि त्या कामात किती खरे पणा किती खोटेपणा समजायला मात्र रस्ता नसतो. म्हणून ऑनलाईन जरूर एक वेळ चांगलं पण आज कागद जमावणारी माणस कमी झाली आणि त्यांची जागा संगणकने घेतली हाच फरक.


     लेखन : एन.के.( पत्रकार ) मो. 8806605852

Thursday, 20 February 2020

परीक्षा युद्ध की यशाची पायरी ??



          फेब्रुवारीची शिवजयंती संपली की दोन-एक महिने परीक्षेची धून सुरू होते अर्थातच मी बोर्डाच्या इयत्ता १२ वी आणि १० वीच्या परिक्षाबद्दल बोलत आहे. मागील काही वर्षात बोर्डाची परीक्षा असली की एकच ऑक्टोबर पासून परिक्षार्थीची धामधूम असायची.

 शाळेच्या नियोजनात पण या परीक्षेला घेऊन कडक नियम करत मुलांकडून चोख अभ्यासक्रम पूर्णत्वाला हात घातलं जायचं न यात शिक्षकांची सुद्धा कसरत व्हायची. अलीकडे आधुनिक काळात परीक्षा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडे असणार एक केंद्रित लक्ष किंवा परीक्षा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अनुक्रमे 20 अमानत गुण, विद्यार्थ्यांना हात लावायचं नाही म्हणून सैसाल मोकळं रान म्हणून आज विद्यार्थी परीक्षा किंवा शालेय असणाऱ्या पुस्तकी उपक्रमात तेवढ्या हिरहिरीने भाग घेत नाहीत जेवढं अगोदरच्या काळात घेतलं जायचं, मोबाईल, टीव्ही, पब्जीसारखे ऑनलाईन खेळ, व्हाट्सएप मैत्री, संभाषण यात अभ्यासासाठी काढून ठेवलेल्या एकूण वेळेतून किमान कमाल वेळ आज कमी होत चालला आहे .
             पाल्य न पालक यांच्या असणारी परीक्षा बद्दलच गांभीर्य काहीसं ढासळत चाललं आहे. पुस्तकांशी मैत्री म्हणजे जीवनाच्या यशाशी मैत्री ही म्हण आता लोप पावत चालली आहे.
जुन्या काळात मॅट्रिक शिकलं म्हणजे नोकऱ्या लागायच्या आज पदवीधर झाल तर शिपाई म्हणून नोकरी लागायची पंचाईत. आजची ही शिक्षण पद्धत काहीशी सोपी झाली पण त्या शिक्षणाचा फायदा आज काही ठिकाणी होताना दिसत नाही बेरोजगारी, अपुऱ्या नोकऱ्या यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. परीक्षेला सामोरे जाताना आज वेळेत अभ्यास करून त्यावर मात मिळावं यासाठी केलेलं गनिमीकावा टाइपचा अभ्यास आज दिसत नाही. खिंड लढवून आल्यासारखं आनंद आता पास झाल्यावर दिसत नाही. कारण शिक्षण पद्धत सोपी मुलांच्या पाठीवरच्या ओझं कमी करण्याच्या नादात आज शिक्षण कमी मार्क जास्त अशी पद्धत-परंपरा रूढ होताना दिसते आहे. शिक्षण घेतल्यानंतर ९०% च्या वर मार्क असणाऱ्या मुलाला आज घरी बसावं लागत आणि आरक्षण असलेल्या मुलाला रस्ता गवसतो. मग शिकायचं का आणि कसं हा प्रश्न असताना जास्त मार्क किंवा मेरिट मध्ये ९५% च्या वर गुणानुक्रम यायला हवं आणि परीक्षेला एक युद्ध म्हणून जिंकण्याच्या हेतूने लढायचं आणि काढलेला किल्ला हाच आयुष्याचा एक पायरी, स्टेप म्हणून बघितलं तरचं शिक्षण या उक्तीचा उपयोग होईल अन्यथा आपली तलवार म्यानातून बाहेर येऊन जगाच्या बाजारात परफॉर्मन्स दाखवणार नाही हे नक्की त्या उद्देशाने पाल्य न पालक परीक्षा कडे बघावं या हेतू हा लेख.


                                           लेखन : पत्रकार एन.के - ८८०६६०५८५२

Monday, 17 February 2020

प्रेम : आई वडिलांवरचं...!

शिर्षक : खरं प्रेम तेच : आई-वडिलांवरचं

       आजची पिढी इतकी प्रगत झालीय की समाजात सत्य आणि असत्य न जाणता अनेक नात्यात सहज गुंफली जाते. अनेकांच्या स्वार्थी किंवा मतलबी या समर्पक नावाची पुष्टी न करून घेता ट्रस्ट नावाचा विश्वास ठेवून बसते. आजकालची पीढीला माहीत नाही की लोकांनी लोकांसाठी बनवलेलं एक नात म्हणजे संबंध हे नक्की मग त्या नात्यात रक्त नाते, मानलेली नाती असे अनेक प्रकार पडतात. वेळ आली की आवाज दिल्यावर येणारे १० तर कारणे सांगणारी १०० अशी अनिष्ट प्रथा आज समाजात वाढीस लागली आहे. सोशल मीडियाचा अतिरेक आजकाल आपण सभोवताल पाहतोच, नव-नव्या कॉन्टॅक्ट लिस्ट आणि मैत्रीच्या नात्याने तयार होणारी नाती काही स्वार्थी अपेक्षांचे ओझे घेऊन लयास जातात. अर्थातच माझ्या म्हणण्याचा हाच उद्देश आहे की आज सजवून धजवून आपल्या न पुढच्याच्या अंगावर स्तुतीसुमने उधळून तयार केलेल्या डुप्लिकेट नात्यात आज काहीसा प्रत्येक युवा ते सम वयस्क लोकांत ईश्क वाला लव्ह होताना दिसतो आहे. युवा वर्ग असो किंवा कोणीही पुरुष किंबहुना महिला किंवा मुलगी प्रत्येकाला नव्या झालेल्या नात्यात एक मेकांबद्दल जाणून घेण्याची चौकस बुद्धी खूप प्रमाणात अन क्षणात वाढताना दिसते. प्रेम होतं न आकर्षण सारख्या मारक गोष्टीतून नात बनत मान्य पण आवश्यक असणारा त्यातला खरेपणा असतोच किती ? वेळ न एक समज ऑफ जवळचा प्लस ओळखीचा म्हणून ओढाताण करून चालू ठेवलेली नाती टिकतातच किती ? सोशल मीडिया किंवा डोळ्याने किंवा वयाच्या न प्रवाहाच्या बदलात आवडलेली नाती ग्रेट म्हणून निवडली जातातच किती?

           

             असा संदर्भ आज घेऊन येण्याचा एकमेव उद्देश की आज हा म्हणतो ना बोलीभाषेत फेमस तसला तो ट्रेंड झालाय पण नात बनलं तर आई वडील सारख बनावं. जे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्या दांपत्यवर असलेली तमा, काळजी, प्रेम कधीही स्वार्थी किंवा उद्देशून व्यक्त होत नाही. सुखात दुःखात कायम काळजीच नव्हे तर त्यात असणारी आपल्या हिताचे सजेशन देणारी ही नाती गुंफणारी ते आई वडील न त्याच नातंच सर्वश्रेष्ठ.  ठेच लागली की आई बाबा वडील हेच सावरणार असतात. कधी अडचण आली तर  माय बापाच्या आशीर्वादाला तोड नसते. पोटच्या गोळ्याला त्रास होऊ नये म्हणून आपल्याला जग माहीत नसताना , आपण या जगात नसताना ९ महिने वाढवलेल्या माउलीने त्रास घेऊन जग दाखवलं तर आजही अशी प्रगत, पाश्चात्य संस्कृतीवर अपार लव्ह करणाऱ्या, जास्त पानांची पुस्तक वाचलेल्या मुलांनी आज अनेक ठिकाणी आई वडिलांच्या जीवाला घोर अर्थातच वृद्धआश्रम दाखवला. न तेही आज लग्न करून आणलेल्या बायकोच्या गॉड बोलीच्या प्रेम जाळ्यात अडकून हे कितपत योग्य आहे...?
तात्पर्य एवढंच की ट्रेंड वाला प्रेम न कमिटमेंटने वाढलेलं प्रेमाचं झाड, वेल एकदिवस वाळून जाणार आहे चांगल आहे की ज्यांनी आपल्याला भूक लागल्यावर दूध पाजलं आपल्या उदरातून त्रास देऊन जग दाखवलं त्यांच्या प्रेमाला उत्तर न उपकार आपल्या जगात कुणाकडे नाहीत पण तेच प्रेम उपकाराच्या छायेत का असेना पण त्यांच्या या वयात न यावेळेत तर प्रेम करा रे ! सांभाळून त्यांच्या वर थोडं तरी प्रेम करा रे !

Wednesday, 12 February 2020

हायब्रीड जगणं...!

शिर्षक :- जगणं आपलं हायब्रीड....!

कालियुगाच्या कलांतरात माणसाने प्रत्येक गोष्टीत गरुडझेप घेतली. अनेक रासायनिक संज्ञा वापरून जीवन आणि आपल्या भौतिक सुखाच्या गरजेच्या वस्तू क्षणिक वेळात मिळवण्याची कला अवगत करून घेतली. जैविक आणि अजैविक विविधता समजून घेताना सांजवेळ आलेली माणसाला समजायला वेळ झालं मग माणसाच्या आयुष्याचा घेरा कमकुवत होत गेला. पण निद्रिस्त पिढीला आता भाकरी ऐवजी पीझझा, आणि बर्गर अतीप्रिय वाटू लागला. समजून आणि उमजून जगण्याच्या पंक्तीतला माणूस आता हरवत चालला आहे.
            

      आता माणूस मांडी घालून जेवायला आज बसत नाही त्याला टेबल लागत तर पाश्चिमात्य खाद्य संस्कृतीला आपलंसं करून देणारी ही मॉडर्न आणि ४० वर्ष जगणारी कल्पक जीवनपट : अर्थात आजची आधुनिक जगणं. आजच्या १०० माणसात ८० लोकांत अनेक सूक्ष्म आणि अनेक मोठी आजार आढळतात कारण एकच की खाण्याच्या पद्धती आणि अती रासायनिक खतांच्या वापराने तयार झालेली पिके न त्यातून बनलेली पदार्थ तर दुसरीकडे चायनीज, अमेरीकन अशा परदेशी खाद्यचंगळ ला आज पसंदी आहे. 
पूर्वी लोक म्हणायचे की कमी खा पण स्वच्छ खा, किंवा खेड्याकडे चला, कारण ही असच होत की तेव्हाची माणसं ८० आणि १०० वा वाढदिवस साजरा करताना दिसतात. तर आजची माणसं वयाच्या ३० व्या वर्षी मधुमेह आणि कॅन्सर सारख्या आजारांची पथ्य पाळताना दिसतात. अगोदर आमच्या परिचीत मध्ये रोगर सारख्या औषध म्हणजे सर्वात विषारी मानलं जायचं, आत्महत्या करायला वापरलं तर त्याची कट्ट्यावर चर्चा होताना अशा भयानक विषारी औषधांची नाव चर्चिली जायची पण त्यांची जागा आता प्रोक्लेम सारख्या विषारी औषधने घेतली म्हणजेच माणसाने विषला सुद्धा जालीम विष तयार केलं म्हणजेच कमी प्रमाण नाही तर अती प्रमाण मधला अतिरेकी वापर म्हणजे अगोदरच औषध फक्त पिकांच्या पानावर कार्य करायचं पण आता अंतर्मुख होऊन विष पूर्ण धान्यात प्रमाण दाखवायला सुरवात केलं. म्हणजे आज आपण खाणार अन्न आणि त्यावर झालेली प्रक्रिया घातक असून आपण रासायनिक धान्य-पालेभाज्या खाऊन स्वतःचे अस्तित्व मातीत गाडून घेतोय इतकंच तात्पर्य. म्हणून आज जगाच्या बाजारात लहान शेतकरी, किंवा कमी प्रमाणात विक्रीसाठी उपस्थित असलेल्या बळीराजाकडून धान्ये आणि भाज्या विकत घ्या. म्हणजे जेणेकरून त्यावर आपल्या आयुष्याचा घेरा ठरवता येईल. यातून एकच बोध देण्याचा मी प्रयत्न करीन हायब्रीड जगण्यात फक्त ४ वाढीव दिवसाची अपेक्षा जगण्याची असेल तर व्यायाम, योग आणि उत्तम अन्न याला पर्याय नकोच.


आपला - एन.के. (पत्रकार) : ८८०६६०५८५२

Tuesday, 11 February 2020

माहीत नसलेला बाप...!

शिर्षक - माहीत नसलेला डोंगराएवढा आपला बाप

      घराला घरपण देणारी माणसं म्हणून आई वडिलांकडे आजकाल पाहिल जातं. समाजाच्या कानाकोपऱ्यात आईला महत्व आणि यशाचं कल्पिक श्रेय कायम देण्यात आलं. घर, खर्च, नाती, अडचणी सोडवणारा बाप माणूस कायम मागच्या रांगेत दिसला. बापाने माणुसकीची झाडं उभी केली, स्वतः कष्टाच्या हिंदोळ्यात गुंतवून घेऊन स्वतःची प्रतिमा झाकोळून जगाला आपल्या आप्तेष्ट असणाऱ्या कुटुंबाची झंकारच कायम प्रकाशझोतात तेवत ठेवली.

     आईच्या सोबतीची आणि मायाळू ऊब कायम सर्वांना समजली पण बापच महत्व आणि बापाबद्दल संदर्भ लेखन आणि उपमा कायम कमी प्रमाणातच आढळली. म्हणतात ना की जिजाबाईंनी शिवाजी महाराजच्या रुपात दैवत ए महाराष्ट्र नक्की घडवला किंवा तसं अवश्य म्हणाव,पण त्याचवेळेस शहाजीराजांची ओढताण सुद्धा लक्षात घ्यावी. शहाजी राजे आपल्या नेतृत्व आणि संभाषण कौशल्य अधिक निधड्या छातीने स्वराज्यासाठी रावण रंक व्यक्तिमत्व निर्माण करून शत्रूला अस्मान दाखवण्याची पुरुषार्थ कला मात्र महाराजांच्या देवाने अर्थात बापानेच दिली अस हे सत्य न स्वीकारावेच सोबत देवकीचं,यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून कृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव पण तितकाच लक्षात ठेवावे. आजच्या आपल्या आधुनिक जगाच्या गाभाऱ्यात वडिलांच्या टाचा झिझ्लेल्या चपलांकडे, पडलेल्या बनियनच्या भोकातून आपल्या बापाची कीर्ती न स्वराज्य नकाशा इतका प्रखर आपला बाप असतो. घरासाठी १-१ रुपयांची कधी न कधी काटकसर केलेला अधोरेखित बाप हा पुण्य दैवत ए होम असतो, दैवत ए जिंदगी असतो, दैवत ए सुख असतो हे विधिलिखित सत्य. 
वडिलांचं महत्व कोणाला कळत? १०० दा बापाच्या प्रशशेंची स्तुतीसुमने गायली तरी कमीच बापाबद्दल लिहायला खूप काही आहे शब्द अपुरे पडतील इतकं बापच व्यक्ती मत्व आहे. अनेक ठिकाणी पितृछत्र हरपलं की घर सांभाळून घराची सावली बनुन राहणारी अनेक मोठी मुले, भावंड, आई, यांची जबाबदारी घेणारी माऊली- मुली असे अनेक जणांना बापाच्या व्यक्तिमत्व बद्दल नक्कीच जास्त माहिती असणार आहे. आईला न घराला बघत बघत स्वतःची इमेज तयार करायला लागणार वेळ आणि त्यानंतर पाठीमागे पाहिलं तर बाबा, पप्पा, वडील यांचं कर्तृत्व आठवलं तर नक्कीच डोळ्यांत अश्रू तरळल्या शिवाय राहणार नाहीत. लग्न सराई त्यात मुलीचं आयुष्य बहराव, मुलगा हवं नको बघितला असेल नसेल पण बापाला एक कप चहा, आणि एक ग्लास पाणी देणारी आपली मुलगी बहीण ताई हिच्या लग्नाच्या वेळी डोंगराच्या आकारएव्हढं बापाचा अंतकरण भरून येत. बापाच्या पश्चात पितृ छत्र नसलेल्या कुटुंबाला एकेक वस्तू, सुख क्षणासाठी , वस्तूसाठी तरसावं लागतं. अस हा बाप, बाबा, फादर, वडील ज्याची ख्याती जगविख्यात आणि डोंगराच्या अथांग विशालतेत पण न मावणारा लक्षणीय आपला बाप. 



- लेखन : एन.के. - ८८०६६०५८५२

Friday, 24 January 2020

फक्त मनाला लढ म्हणा..!

शिर्षक - फक्त मानाला लढ म्हणा...!


 [ कष्टाच्या झाडाखाली चढ आणि उताराची सावली असतेच, चांगल्या म्हणवणाऱ्या दिवसा मागुन वाईट दिवसांची झालर येत असतेच, बहरलेल्या झाडाला वाळवी लागल्यासारख माणसाच्या आयुष्यात देखील अनेक नयन पाणावणारे क्षण एक ना एक दिवस गर्दी करतातच, म्हणून जगण्याला अर्थ नाही म्हणून देवाला आणि दैवाला दोष देणारे आपण सर्रास पाहतो, पण पडलेल्या रास्तावरच्या खड्याला बायपास मारून नवीन सुरवात करून आसवांना आनंद अश्रुत कन्व्हर्ट करणारा एक छोटासा किमान-कमाल प्रयत्न माझ्या या लेखद्वारे...]

        सामान्य माणूस जगायला खऱ्या अर्थाने जगायला लागला तेव्हा त्याची भूक समजली आणि आजवर कमी कमी म्हणत मला कमी पडतंय म्हणून वयाच्या काठी पर्यंत मला हवं हवं म्हणून हव्यासी बनून गेला. कमी जास्त काम जास्त म्हणत साठवत गेला पण कधी सुखं म्हणून अनुभवला का नाही ना ? क्वचितच सोडले तर ऐश आराम वगळता कौटुंबिक तथा जगण्याचं खरं सुख मात्र कोसो दूर गेला आणि ते सुख अगदी बोटावर मोजणी होईल इतक्याच लोकांनी अनुभवली. काम, काबाड कष्ट, मेहनत करून हव्या त्या गोष्टी आज आपल्याला साध्य ही करता येतात हो पण शेजारी असा तसा म्हणून आपले असे तसे रस्ते बदलणारे बाहुल्यांचे वाटाड्या म्हणवणाऱ्या वाटसरूची संख्या मात्र अमाप झाली आहे. देवाच्या देवळात जाताना महागडी चप्पल कडे साधारण १०००-१२०० च्या चपलाकडे लक्ष देणारा आणि गरीब १-२ रु. देताना १०० द विचार करणारा कृत्रिम मानव आज निर्मित झाला आहे. देवाकडे जाताना मागण्या शंभर एक असतात पण देताना हात मात्र पठयाचे आकुंचन पावतात म्हणजे स्वार्थी वृत्तीच जग आपल्या भोवताल आहे. आपल्याला आज कष्ट करायचं आहे तर व्यासपीठ शोधावं लागत. व्यासपीठावर आपला वचक असायला हवं तर कष्टाचे पाढे मात्र २-३ वेळा जास्तीचे पाठ करावी लागतील इतकं समरस परिस्थिती मात्र नक्की आहे. सर्रास आपलं सामान्य जनजीवन घेतलं तर आज अनेकांच्या हाताला काम नाही, धंदा करावं तर मार्केट नाही, भांडवल नाही. या अशा नैराश्यात जगणारा आजचा बेरोजगार नोकऱ्या, आणि कामासाठी वणवण भटकंती करताना दिसतो आहे. कुटुंब आई वडील बायको आणि समाज यांच्या समोर मी व्यस्त दिसलो पाहिजे कामाला असल्याचं एक स्व समाधान आणि समाज सोबत कुटुंबाला दिलासा म्हणून कार्य करत राहणे म्हणजे एकच ध्येय हा आजच्या सर्वांगीण तरुण पिढीचा पाढा झाला आहे. अशात कर्ज काढून भांडवल करणे, धंद्याला चालना मिळायच्या आत आर्थिक मंदीची झळ आणि परत रस्त्यावर येऊन बेरोजगार नावाचा शिक्का माथी घेऊन हिंडणे हीच दिनचर्या बनून जाते. अशा वेळी मन सुन्न होत आणि वेगवेगळ्या नाहक आणि दृष्ट विचारांनी मन ग्रासत आणि अशा वेळी संयम सोडून हातात दोरी, किंवा नोकरीच्या आमिषाने संसार आणि कुटुंबाची राखरांगोळी करणाऱ्या कुटुंबाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे कुठं तरी थांबलं पाहिजे, असे तरुण आणि मंदीमुळे कंपण्यातून बडतर्फ झालेल्या बेरोजगार गटातील व्यक्तींनी टोकाचा निर्णय न घेता सावरत स्वविश्व उभं करावं न मुंगी होऊन का होईना पण साखर खात जगावं ही गरज, आणि जन जागृती आहे.
      ह्या संदर्भद्वारे इतकंच मत प्रकट करेन की आपण सगळे निव्वळ श्वास घेतोय जगतोय म्हणून जगणं सुरू आहे असा पाढा आहे. आपली तीच मळलेली वाट, त्या वाटेवरचे तेच जुने धुळीचे कण झेलत आपणही जुने होतोय, वर्ष निघून जातात, काही दिवस आणि रात्र काढून एखाद्या दगडाला ठेच लागून पडतो, थांबला जातो तिथंच नकारात्मक गोष्टीचा उदय होतो न आपण संपलं सगळं आता खूप आपण जग पाहिलं पण त्यातून आपण हरलो म्हणून दुःखाला कवटाळून क्षण क्षण संपत जातो. आतून शुष्क होतोय खचला जातोय, पण हा कधी विचार मनात आणत नाही की कधी तरी, कुठे तरी ह्या प्रवासाला नवीन दिशा देत आपला मार्ग जिवंत जगण्याकडे जाईल का ? संपलेल्या वाटेवर नवी चैत्र पालवी फोडता येईल का ? सूक्ष्म सही पण छान जगणं पुन्हा जगता येईल का ? हा विचार कदापी मनात येत नाही. म्हणून चला पेटून उठा आणि म्हणा " स्पर्धा अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही" आपल्या चांगल्या वाणी आणि कुशाग्र वागण्यातून जगाला आपलंसं करत माणसांमधलं आणि परिस्थितीमधलं वैविध्य कुशलतेने हाताळत आपलं स्वतःच जग आणि व्यक्तिमत्त्व विशेष प्रभावशाली करा. समजून ज शून्य आहे मी आणि ज्याच्या सोबत असेन ज्या रस्त्यावर माझी वाटचाल असेल त्याची किंमत नक्की दूगनी (दुप्पट ) करेन म्हणून संघर्षाला आज पासून लागा. स्वतः स्वतःला घडवा नक्की यश मिळेल जळणारे आणि आपल्या लहान कार्याला बघून आता हसणारे बाकीचे मात्र कधी अहंकार तर कधी आत्मसन्मान तर कधी भावनिक कुचंबणा ह्यातून सामान्यच राहतील अशी गोड समजूत मनाला द्या आणि आपल्या वाटचालीत आपण कुठे माघार घ्यायची ,कुठे पुढाकार घ्यायचा हे स्वतः आत्मपरीक्षण करून ठरवा. जगाच्या सल्ल्याची किंचितही वाट बघू नका. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जगू तोपर्यंत आयुष्याची संध्याकाळ खुणावू लागलेली असते. मग जाता जाता बघा जमलं तर अस जगायला " मनाचा थांग लागू न देता स्वच्छंद जागा म्हणजे एक विलक्षण संयमित मुखवटा जगाला दिसेल ही पण तुमचा आतला पॉवर ऑफ न्यू च्यापटर कायम कार्यरत ठेवा. सोबत यश शिखर सर केल्यावर आपली माणसं जी संकटात उभी होती त्यांचं ही मन जिंका. आजच्या युगात मानसिक संघर्ष, उलथापालथ घडत असताना,शब्दांना मौनाचा बांध घालणं खूप कठीण असते अशा देवाने निर्माण केलेली अशी माणसं आजूबाजूला असताना आपण नक्की कुठे चुकलो आणि अपयशी झालो त्याचा आरसा ठेवा आणि लेट बट ग्रेट जगायला सुरू करा.

धन्यवाद...!      - पत्रकार एन.के.- 8806605852